निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) राष्ट्रीय राजकीय पक्षाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी सुनावणी घेतली. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी योग्य ते निकष पूर्ण करत आहे की नाही यावर निवडणुक आयोग चर्चा सुरू करणार असल्याचे निवडणुक आयोगच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांकडूव निवडणुक आयोगाने बाजू ऐकून घेतली.
EC च्या दिल्ली कार्यालयात सुनावणीला उपस्थित असेलेले राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रप्फुल्ल पटेल म्हणाले, “निवडणूक आयोग दर पाच वर्षांनी पक्षांच्या राष्ट्रीय दर्जाचा आढावा घेते. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासंबंधीत सुनावणी घेण्यात आली.”खासदार प्रफुल्ल पटेल व अन्य काही नेते अशोका रोडवरील निवडणुक आयोगाच्या मुख्यालयात हजर होते.
आयोगाने फेरआढावा घेण्याच्या आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या वतीने खासदार प्रफुल्ल पटेल व अन्य काही नेत्यांनी आयोगाच्या अशोका रस्त्यावरील मुख्यालयात हजेरी लावल्याचे सांगण्यात आले. याबाबत राष्ट्रवादीची बाजू जाणून घेण्यासाठी पक्षनेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
दरम्यान, निवडणूक आयोगाने इतर चार पक्षांच्या राष्ट्रीय दर्जाबाबत संबंधित पक्षांना विचारणा केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीसह बहूजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) आणि तृणमूल काँग्रेस यांनाही नोटीसा पाठवल्या होत्या.