तीर्थक्षेत्र विकास मंत्रालय सुरु करुन तीर्थक्षेत्रांच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक व्हावी अशी मागणी
कोल्हापूर : महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी महिलांसाठीचा शक्ती विधेयक लवकरात लवकार आंमलात आणलं पाहिजे असे मत शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. त्या आज कोल्हापूरात माध्य़मांशी बोलत होत्या.
“महिलांवरिल अत्याचार, त्यांच्या अडचणी आणि त्यांना विकासाचा अधिकार देण्यासाठी शासनाने निधी मंजूर केला पहिजे. आणि शक्ती विधेयक आणणे गरजेचं आहे. या विधेयकाचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत आहोत.” याचबरोबर राज्यातील तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी तिर्थक्षेत्र विकास मंत्रालय स्थापन करण्याची गरज असून त्याद्वारे भविकांची होणारी गैरसोय टळेल.” असेही त्या म्हणाल्या.
उद्धव ठाकरे यांचा बी प्लॅन काय असेल असे विचारले असता निलम गोऱ्हे म्हणाल्या “हवेत पतंग उडवल्याप्रमाणे माध्यमात चर्चा पेरल्या जात आहेत, प्लॅन ए किंवा बी याचा प्रश्नच नाही. आमचा मार्ग सत्याचा आहे, न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. न्यायालयाबरोबरच जनतेच्या कोर्टात सर्वोच्च निकाल असतो. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांचे काम जनता जनार्दनाच्या सिहांसनावर समर्पित आहे. त्यावर कोणाचं नाव राहील हे निवडणुकीत ठरणार आहे. अशा गोष्टींनी विचलित होण्यापेक्षा आमचे लक्ष जनतेच्या समस्यांकडे आहे. अशा छोट्या गोंगाट्याकडे आणि धुरळ्याकडे आम्ही लक्ष देत नाही.”