पावसाळ्dयात खंडित वीजपुरवठा समस्येवर येणार नियंत्रण
वाळपई : सत्तरी तालुक्यातील नगरगाव पंचायत क्षेत्रातील नानोडा, बांबर, उस्ते, धावे, देरोडे, साट्रे आदी भागातील वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर वीज खात्याच्या वाळपई कार्यालयाने बंच केबलची नव्याने जोडणी करण्याच्या कामाला सुऊवात केली आहे. यामुळे पावसाळ्dयात निर्माण होणाऱ्या समस्या नियंत्रणात येतील, असा दावा खात्याच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. नगरगाव पंचायत क्षेत्रातील उपरोल्लेखित गावात सुमारे 39 किलोमीटर अंतरात बंच केबलची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याला सुमारे 25 पेक्षा जास्त जोडण्या देण्यात आलेल्या आहेत. या जोडण्या जुन्या झाल्यामुळे वारंवार बिघाड होत असतो. परिणामी गावांमध्ये सातत्याने वीजपुरवठा खंडित होतो. रात्रीच्यावेळी बिघाड झाल्यास रात्रभर नागरिकांना त्रास सहन करावे लागतात.
आठ दिवसांपासून अशी स्थिती निर्माण होत असल्याने संतप्त नागरिकांनी वाळपईच्या वीज कार्यालयाच्या सबस्टेशन विभागावर मोर्चा नेऊन संताप व्यक्त केला होता. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत तातडीने लक्ष देण्याची मागणी केली होती. यावेळी अधिकऱ्यांनी बंच केबलची नव्याने जोडणीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार कामाला सुऊवात करण्यात आली आहे. आतापर्यंत 50 टक्के जुन्या जोडण्या नव्याने करण्यात आल्या आहेत. उर्वरित जोडण्या दोन दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, बंच केबलमध्ये वारंवार होणाऱ्या बिघाडाची दखल घेऊन संबंधित भागामध्ये भूमिगत वीज केबल घालण्याचे दोन प्रस्ताव तयार केले असून ते मंजुरीसाठी वीज खात्याच्या प्रमुख अभियंता कार्यालयामध्ये पाठविण्यात आले आहेत. त्यांना अद्याप मंजुरी मिळाली नाही. या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास संबंधित भागामधील समस्या कायमस्वरुपी निकालात येतील, असे वीज खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.