मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे बदल्या बढत्यांचा उत्सव : सेनेची मोदींवर टिका

ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळालेल्या शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे आपल्या मुखपत्रातून भाजपवर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार बदलत्या बढत्यांचा उत्सव असून त्यावर फार चर्चा न पेलेली बरी असा खोचक टोला लागवला आहे.
देशाला अनेक प्रश्न भेडसावत असताना कोणत्या मंत्रालयाने नक्की कोणते प्रश्न सोडवले असा सवालही ‘सामना’तून उपस्थित करण्यात आला आहे. ‘निवडणुका जिंकणे व सरकारे बनवणे हाच सध्या राजकीय, पण राष्ट्रीय खेळ झाला आहे. त्यामुळे सरकारी पटावरील प्यादीही त्याच पद्धतीने बसवली व चालली जातात’, असे म्हणत शिवसेनेने ‘सामना’तून पंतप्रधान मोदींसह भाजपसह अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने केंद्र सरकारच्या कामावर नाराजी व्यक्त करत घरचा आहेर दिला आहे. “केंद्रात मोदी सरकार स्थानपत्र होऊन आता तीन वर्षे झाली आहेत. मात्र तीन वर्षांनंतरही मंत्रिमंडळात प्रयोग सुरू आहेत. अच्छे दिनाचा चमत्कार होण्याच्या प्रतीक्षेत देश आहे.’