ऑनलाईन टीम/ तरुण भारत
राज्यात सत्तास्थापनेवरुन गदारोळ सुरु असताना आता भाजप नेते निलेश राणे यांनी यात उडी मारली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना थेट इशारा दिला आहे. पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. त्य़ांनी आयपीएलची तयारी करावी असा सल्ला ट्विट करत राणे यांनी दिला आहे.
ट्विटमध्ये राणे म्हणतात, शिवसेनेचे 11/12 आमदार शिवसेने सोबत राहतील अशी परिस्थीती आहे, पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. हे 11/12 घेऊन IPL team साठी तयारी करा… मातोश्री 11 बनवा असे ट्विट त्यांनी केले आहे.