कोल्हापूर – राष्ट्रवादीमध्ये असताना नितीन गडकरी यांना खूप भीत होतो. मात्र गडकरी यांनी काहीही न विचारता लगेच बास्केट ब्रीजला मंजुरी दिली. या ब्रीजमुळे कोल्हापुरात खूप राजकारण झाल. कोल्हापुरात खूप खालच्या पातळीच राजकारण सुरू असल्याची खंत धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली.
मी 2 वेळा पराभूत झालो. मात्र २०१४आणि २०१९ला संकल्पना आणली मात्र, नंतर माझा पराभव झाला आणि माझ्या ब्रीज ची खिल्ली उडवली गेली. १२ ते १३ वर्ष विरोधकांकडे सत्ता असून ही त्यांनी कोणताही विकास केला नाही. केवळ स्वतःच विकास केला. सर्व सत्ता आपल्याकडे पाहिजे अशी विरोधकांची इच्छा होती अशी टीका महाडिक यांनी केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, बास्केट ब्रीजमुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
आम्हाला या पुरातून वाचवा अस आवाहन गडकरींना केलं होतं. अंबाबाईच मंदिर असल्याने लाखो भाविक कोल्हापुरात येतात यामुळे ट्रॅफिकची समस्या वाढत आहे.
यामुळे कोल्हापूर शहरात ही फ्लाय ओव्हर करून द्यावा अशी मागणी महाडीक यांनी यावेळी केली.
कोल्हापुर महानगर पालिकेसाठी 75 इलेक्ट्रिक बसेस मिळावी तसेच कोल्हापुरातील सर्व किल्ल्यांनवर रोपवे करून देण्याचं महाडिकांनी गडकरींना साकडे घातले.