भारतीय जनता पक्षाचे नेते के. अन्नामलाई यांनी काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकार वर्षभरात पडेल असा दावा केला. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यात 2024 पर्यंत वितुष्ट येणार आहे. आणि जर असे झाले नाही तर त्या दोघांना शांततेचे नोबेल पारितोषिक द्यायला हवे असे त्यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “कर्नाटक सरकार वर्षभरानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना दिसेल. जर डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या 2024 पर्यंत एकमेकांशी लढले नाहीत, तर शांततेचे नोबेल पारितोषिक दोघांनाही दिले पाहिजे…कारण नविन सरकारची रचना हि दोषपूर्ण आहे.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “कर्नाटकात आपण वर्तमानपत्रामध्ये रोज वाचतो की, पहिला मुख्यमंत्री २.५ वर्षे राज्य राहील आणि दुसरा मुख्यमंत्री २.५ वर्षे राज्य करेल. आणि तोपर्यंत एकच माणूस उपमुख्यमंत्री असेल. हे चुकिचे आहे. तसेच मुख्यमंत्र्याला 10 मंत्रीपदे, उपमुख्यमंत्र्यांना 10 मंत्रीपदे आणि AICC (ऑल इंडिया काँग्रेस कमिटी) 10 मंत्रीपदे मिळतील असे बोलले जात आहे. जगात कुठेही अशी रचना पाहिली आहे का?” अण्णामलाई यांनी विरोधी पक्षांच्या ऐक्याचाही समाचार घेताना ‘काँग्रेसमध्येच ऐक्य नसताना कोणते ऐक्य होणार? असा सवाल केला.