खानापूर : खानापूर तालुक्यात पावसाळ्यात होणाऱ्या पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. पूर परिस्थिती हाताळण्यासंब्ंाधी बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. तालुक्यात पावसाळ्यात येणाऱ्या पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने मार्गदर्शक सुची जारी केली आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय बैठकीनंतर तालुक्यात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाल्यास नियोजन करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून गंगाधर दिवाकर यांची खानापूर तालुका पूर नियोजन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी किंवा पूर आल्यास बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील सर्व खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी मुख्य अधिकारी गंगाधर दिवाकर यांनी सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व सूचना केल्या आहेत. 2019-20 साली आलेल्या महापुराच्यावेळी ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करून पूर सदृश परिस्थिती निर्माण झाल्यास बचाव कार्य तातडीने सुरू करण्यासंदर्भात यावेळी नियोजन करण्यात आले आहे.
Previous Articleजिल्ह्यात तेलबिया क्षेत्रात होणार वाढ
Next Article ‘लम्पी’ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला जिल्ह्यात प्रारंभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment