पणजी : संजीवनी सहकारी साखर कारखान्यातील 177 कामगारांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी सरकारने नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे हा कारखाना पुन्हा सुऊ होण्याची आशा मावळली असून तो कायमस्वऊपी बंद होत असल्याचे आता समोर आले आहे. गेल्या काही वर्षांपासून सदर कारखाना बंद असून तो पुन्हा चालू करणार असल्याचे सांगण्यात येत होते. शिवाय तेथे दुसरा (इथेनॉल) प्रकल्प सुऊ करण्याची योजना असल्याचे अनेकदा घोषित करण्यात आले परंतु सध्यातरी तेथे काहीच न होता हा कारखाना बंद केला जाणार असल्याचीच चिन्हे दिसत आहेत. संजीवनीच्या सर्व कामगारांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना अंमलात आणावी असे निर्देश वित्त खात्याला देण्यात आले असून त्या करीता निधी पुरवावा, असे बजावण्यात आले आहे. कामगारांची अंतिम देय रक्कम वितरीत कऊन अंतिम तडजोड पूर्ण करावी, असेही सूचित करण्यात आले आहे. संजीवनीच्या कामगारांना वेतन व इतर खर्चासाठी निधी पुरवण्यात आला असून त्या सर्वांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारावी, अशी अधिसूचना सरकारने जारी केली आहे. त्यामुळे सरकारचा संजीवनीबाबतचा इरादा स्पष्ट झाला असून गोव्यातील एकमेव असा हा साखर कारखाना आता संपल्यात जमा आहे. स्वेच्छानिवृत्तीसाठी त्या कामगारांवर कोट्यावधी खर्च होणार आहेत.
Previous Articleविधानसभेत ‘एसटी’ राखीवतेस केंद्राकडून अद्याप प्रतिसाद नाही
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.