Ajit Pawar : ओडिशातील बालासोर येथे झालेला अपघात ही मोठी चूक मानायला हवी. नैतिक जबाबदारी घेवून रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. आज ते माध्यमांशी संवाद साधत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, भारतात एकीकडे बुलेट ट्रेन सुरु केली जातेय. काही ठिकाणी रेल्वे रूट खासगीकरण केलेलं आहे. तर दुसरी सिग्नल योग्यपध्दतीने पाळला गेला नाही . यामुळे अनेक निष्पाप जीवांचे बळी गेले. त्यांची याच काय चूक आहे?असा सवाल सरकारला केला. रेल्वे दुर्घटनेतील बळी हे सरकारचं अपयश असल्याचेही ते म्हणाले.
आतापर्यत पाच रेल्वे मंत्र्यांनी अशा दुर्घटनेनंतर राजीनामा दिला आहे. रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने झालेली घटना परत येणार नाही. मात्र खालील लोकांना चांगलीच चपराक बसेल आणि पुढे भविष्यात होणारे असे अपघात टाळता येतात. म्हणूनच रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा असेही ते म्हणाले.
2024 च्या निवडणुकी तयारीसाठी अजित पवार विदर्भात आहेत .कारण विदर्भात त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, राष्ट्रवादीची स्थापना 1999 साली झाली.2004 साली 14 जागा निवडून आल्या. मात्र त्यानंतर आम्हाला हे टिकवता आला नाही. दुर्देवाने आम्हाला तेवढा प्रतिसाद मिळत नाही.विदर्भात पयत्न केला तर जनता पाठीशी उभी राहू शकते अशी आम्हाला खात्री आहे. विदर्भावर अन्याय केल्याचा खोटा प्रचार करण्यात आल्याचेही ते म्हणाले.