नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग व वेताळ प्रतिष्ठानचा संयुक्त उपक्रम
On behalf of Vetal Pratishthan, cleaning of Gharagar beach was done
स्वच्छ्ता उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस कडून पुन्हा एकदा सामाजिक भान जपत सागर किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. यावेळी आरवली येथील वेळागर सागरी किनारा आणि परिसराची श्रमदानातुन स्वच्छ्ता करण्यात आली.
नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या वतीने स्वच्छ भारत मिशन २.० अंतर्गत विविध ठिकाणी स्वच्छ्ता उपक्रम राबविण्यात येत आहेत. मागील महिन्यात सागरतीर्थ किनारा व परिसर, डोंगर परिसर व पर्यटन स्थळ स्वच्छ्ता मोहीम राबवण्यात आली होती. यावेळी वेंगुर्ला आरवली येथील वेळागर सागर किनारा व परिसराची स्वच्छता करण्यात आली.
पर्यटनदृष्टया महत्वपुर्ण असल्याने महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान निसर्ग सौन्दर्याने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासात स्वच्छ व सुंदर सागरी किनाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. हे सौंदर्य टिकवून पर्यटन विकास करण्याकरिता सागरकिनारा स्वच्छता महत्वाची असते. याचे महत्व लक्षात घेऊन व सामाजिक बांधिलकीचे भान राखून वेंगुर्ले तुळस येथील वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेने युवक युवतींना स्वच्छता विषयक जाणीव जागृती व्हावी,श्रमाच महत्त्व कळावं या उद्देशाने स्वच्छ भारत मिशन २.० अंतर्गत सागर किनारा स्वच्छता केली.
वेंगुर्ले (वार्ताहर)-