बिडी-हल्याळ रस्त्यावर गोल्याळीजवळ दुचाकीची बसला धडक : तिघांची प्रकृती चिंताजनक
प्रतिनिधी / खानापूर
हल्याळ रस्त्यावर गोल्याळी फाट्याजवळ बस आणि दुचाकी अपघातात एक ठार तर तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना गुऊवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडली आहे. जखमींना अधिक उपचारासाठी बेळगाव येथील जिल्हा ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील जखमी यल्लाप्पा प्रकाश व्हनूर (वय 25) याच्यावर उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला आहे. तर इतर तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. नंदगड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
कडतन बागेवाडी येथील भीमाप्पा व्हनूर, पल्लवी व्हनूर, यल्लाप्पा व्हनूर आणि ऐश्वर्या व्हनूर हे आपल्या हिरोहोंडा केए 22-एचएफ-8307 दुचाकीवरून आपल्या गावी जात होते. गोल्याळी फाट्याजवळ शिरशी डेपोची बस क्रमांक केए 42-एफ-0927 बेळगावला येत होती. यावेळी गोल्याळी फाट्यानजीक दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसला धडक बसली. यामध्ये व्हनूर कुटुंबीय गंभीर जखमी झाले आहे. अपघाताची भीषणता इतकी हृदयद्रावक होती की, यात यल्लाप्पा व्हनूर याचा पाय जांघेपासून तुटून रस्त्यावर पडला होता. तर पल्लवी आणि ऐश्वर्या यांना जबर मार बसल्याने बराच रक्तस्त्राव झाला. तिघांच्याही डोकीला जबर मार बसला आहे. अपघातस्थळी 108 रुग्णवाहिका वेळेत पोहचू शकली नाही. चारही जखमी रस्त्यावर तडफडत पडले होते. रुणवाहिका एक तास उशिरा आल्याने जखमींचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. वारंवार दूरध्वनीवरून संपर्क साधूनही रुग्णवाहिका एक तास उशिरा आली. जखमींना रुग्णवाहिकेतून खानापूर येथील सरकारी दवाखान्यात आणण्यात आले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी बेळगाव येथील बिम्स इस्पितळात पाठविण्यात आले आहे. याबाबत नंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. बेळगाव येथे जखमींवर उपचार सुरू असताना यल्लाप्पा प्रकाश व्हनूर (वय 25) याचा मृत्यू झाला आहे. तर पल्लवी भीमाप्पा व्हनूर (वय 14) आणि ऐश्वर्या भीमाप्पा व्हनूर (वय 16) यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.