घाटातील पाऊस आणि धुक्यामुळे घडली घटना
सावंतवाडी/प्रतिनिधी:-
सावंतवाडीतून घरी परतत असताना आंबोली घाटातील पाऊस आणि दाट धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने घाटातील कड्याला दुचाकीची धडक बसून ४२ वर्षीय व्यक्ती दरीत कोसळल्याची घटना गुरूवारी रात्रौ घडली. गणपत राजाराम राऊत (वय ४२, राहणार आंबोली) असे त्यांचे नाव आहे. राऊत हे तरुण भारत या वृत्तपत्रामध्ये कार्यरत आहेत.
केवळ दैव बलवत्तर म्हणून दरीतील वीस-पंचवीस फुटावर ते अडकून पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. यावेळी तेथून जाणाऱ्या इतर वाहनधारकांनी आंबोली पोलिसांना याबाबतची खबर दिल्यानंतर आंबोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले व आंबोली रेस्क्यू टीमच्या सहकार्याने राऊत यांना बाहेर काढले.