लहान मुलांच्या स्वच्छता मोहिमेत आढळला बाटल्यांचा खच; पोलीसांचे दुर्लक्ष
कोल्हापूर प्रतिनिधी
ऐतिहासिक रंकाळा तलावाचा परिसर तळीरामाचा अड्डा बनला आहे. रात्रीच्या वेळी येथे पुन्हा जेवणावळी आणि पाटर्या वाढल्या आहेत. परिसर ओपन बार बनला आहे. पोलीस प्रशासन मात्र याकडे कानडोळा होत आहे.
महापालिकेने उद्यानामध्ये जेवणावळी बंद केल्या होत्या. कोरोनामध्ये तर उद्यानात प्रवेश दिला जात नव्हता. यामुळे उद्यानातील रात्रीच्या वेळच्या जेवणावळी थांबल्या होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा उद्यानामध्ये ओली पार्टी सुरू झाल्या आहेत. रंकाळा तलाव परिसर याला अपवाद नाही.
तांबट कमान परिसर, रंकाळा पदपथ उद्यान, खण विहार परिसरात रात्रीच्या वेळी मद्यपींची गर्दी झालेली असते. पार्टी झाल्यानंतर मद्याच्या बाटल्या, प्लास्टिक ग्लास टाकून परिसर अस्वच्छ केला जातो. काहीजण तर मद्याच्या बटल्या फोडून जातात. यामुळे सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्यांना याचा नाहकत्रास होतो.
शिबिरातील मुलांनी केली स्वच्छता
रंकाळा येथे व्हाईट आर्मीच्यावतीने समृद्ध भारत बालसंस्कार शिबिर सुरू आहे. संस्कार शिबिरातील सहभागी मुलांनी सोमवारी रंकाळा परिसरातील तळीराम यांनी केलेला कचरा गोळा केला. यावेळी मद्याच्या बटल्याचा खच आढळून आला. 1 हजार बाटल्या आणि 25 पोती कचरा उठाव करण्यात आले.
मुलांनी काय संस्कार घ्यायचे?
व्हाईट आर्मीच्या बालसंस्कारमध्ये 7 वर्षापासून 14 वर्षाच्या शालेय मुलांचा सहभाग आहे. या मुलांनी ऐतिहासिक रंकाळा परिसराची स्वच्छता केल्यानंतर त्यांना मद्याच्या बटल्या मोठ्या संख्येने आढळून आल्या.