प्रतिनिधी/वाळपई
पावसाळी मौसम अवघ्या एक महिन्यावर आला आहे. पंचायतीच्या निवडणुका जूनमध्ये होणार असून तत्पूर्वी आचारसंहिता लागू होणार आहे. यामुळे सत्तरी तालुक्मयातील पावसाळी पूर्व कामे अर्धवट राहाण्याची शक्यता आहे. गटविकास अधिकाऱयांच्या व्यवस्थापनाने मान्सूनपूर्व कामांना गती द्यावी, अशी मागणी सत्तरी तालुक्मयातील नागरिकांनी केलेली आहे.
दरवषी मान्सूनपूर्व कामांना मे महिन्यामध्ये सुरुवात होत असते?. यासाठी विविध पंचायतीकडून कामासंदर्भात प्रस्ताव गटविकास अधिकाऱयांना सादर करण्यात आल्यानंतर त्याला मंजुरी प्राप्त होत असते. यंदा पंचायत निवडणुका 4 जून रोजी होण्याची अपेक्षा आहे. निवडणुका निश्चित झाल्यास आचारसंहिता लागू होऊन पंचायत क्षेत्रांमधील मान्सूनपूर्व कामे ठप्प होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.
पंचायत क्षेत्रांमधील मान्सूनपूर्व कामांना गती देणे अत्यंत गरजेचे असते. पावसाळी मोसमात गटारे साफ नसल्यास पाणी रस्त्यावरुन वाहते तसेच रस्त्यावर माती पसरुन वाहनचालकांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सदर माती साफ करुन रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करणे अत्यंत गरजेचे आहे.
दरम्यान, वाळपई गटविकास अधिकारी सूर्याजीराव राणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सत्तरी तालुक्मयातील काही पंचायत मंडळाने कामासंदर्भात प्रस्ताव कार्यालयात पाठवलेले आहे. त्यावर कार्यवाही सुरू असून लवकरच प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार आहे. मात्र अनेक पंचायतीने अजून पर्यंत मान्सून पूर्व कामासंदर्भाचा प्रस्ताव सादर केलेले नाहीत. त्यामुळे सदर पंचायतीमध्ये पावसाळापूर्व कामे करण्यास अडचणी निर्माण होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.