पावसाळ्यात वातावरण खूप आल्हाददायक आणि थंडगार असते, वातावरणानुसार खानपान सुद्धा बदलतो. भूक जास्त लागते. पण खाण्यात वैयक्तिक स्वच्छता नाही पाळली तर मात्र आजाराला निमंत्रण देतो.
खाण्याधी हात धुणे, जेवणं झाल्यावर चुळ भरणे,दोन वेळा दात घासणे,
नखं स्वच्छ ठेवणे
शौचालयचा वापर केला तर हात स्वच्छ धुणे
उलटी, अतिसार, जुलाब, पोट दुखणं, पोटात मुरडा येणं इ.
त्वचा रोगाचं प्रमाणात वाढ असते ; खाज, खरूज, नायटा, पुरळ, इ.
संक्रमित आजार जसे ताप, सर्दी, फ्लू इ. होऊ शकतो.
भाज्या खायच्या आहेत तर हे वाचा
पावसाळ्यात शेतात भरपूर चिखल असतो आणि भाजीपाला तोडताना हा चिखल तुडवला जाऊन भाजीपाल्याला घट्ट चिटकतो. तो वाळला की बरेचदा धुवून सुद्धा निघत नाही. त्यामुळे तो भाग काढून टाकलेलाच बरा.
पावसाळ्यात पिकांवर विविध किडी व रोगांचं आगमन होत असते, भाजीपाला सुध्दा त्याला अपवाद नाही. त्यामुळे असा भाजीपाला टाळलेलाचं बरा.
सतत पावसाची रिपरिप सुरू असेल तर, भाजीमंडईत खुप चिखल असेल तर पालेभाज्या कटाक्षाने टाळा,
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे फळभाज्या नळाच्या वाहत्या पाण्यातच धुवून घ्या, यामुळे त्यावरची घाण तर स्वच्छ धुवून निघेल. धुवून घेणं शक्य नसल्याने त्यांचा मोह पावसाळ्यात तरी टाळलेला बेहत्तर.
शक्यतो कच्चा भाजीपाला खाणं टाळा