बेळगाव प्रतिनिधी : गेल्या काहि वर्षांपासून ओल्या दुष्काळाचा सामना शेतकर्यांना करावा लागत आहे. यामध्ये शेतकरी कर्जबाजारी बनत चालला आहे. शेतकर्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई हि तुटपुंजी आहे. तेंव्हा योग्य नुकसान भरपाई द्यावी, यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकार्यांना कना&टक राज्य रयत संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. शेतकर्याला पिक घेण्यासाठी प्रथम एकरी 20 ते 25 हजार रुपये खर्च करावा लागतो. इतका खर्च करुन नुकसान झाल्यानंतर शेतकर्यांना मोठा फटका बसत आहे. एक तर खर्च केलेली रक्कमहि त्याच्या अंगलट येत आहे. तेंव्हा तातडीने नुकसान भरपाई दिली पाहिजे. ती हि किमान एकर 40 ते 50 हजार रुपये द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकरी रग्बी किंवा खरीप पेरणीसाठी सोसायट्या व बँकांमधून कर्ज काढतो. तेंव्हा ते कर्ज भरणे अवघड आहे. सलग चार वर्षे हे नुकसान झाले आहे. तेंव्हा तातडीने संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. नुकसान भरपाई मिळविण्यासाठी शेतकर्यांना अर्ज करताना त्रास होत आहे. याचबरोबर अर्ज स्वीकारणे तसेच इतर निवेदने स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र काऊंटर सुरू करावे, अशी मागणी करण्यातआली आहे. यावेळी चुनाप्पा पुजारी, शिवानंद मुगळीहाळ, सुरेश परगण्णावर, गणपत ईळगेर, राघवेंद्र नायक, प्रकाश नाईक, राजू मरवे, परशराम बेळगावकर, शिव ईळगेर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
Trending
- वाळवा तालुक्याच्या विकासासाठी मताधिक्य द्यावे : खास . धैर्यशील माने
- शेतकरी व महिलांच्या प्रश्नांवर भाजपने बोलूच नये : उमेश आपटे
- रात्रीचा दिवस करून धैर्यशील माने यांना उच्चांकी मतांनी निवडून आणू- प्रकाश आवाडे
- पक्षफोडीची नाराजी मतदानातून उमटेल : मालोजीराजे प्रतिपादन
- दक्षिणोत्तर विकास पर्वामुळे ‘दक्षिण‘ची जनता मंडलिक यांच्या पाठीशी- राजेश क्षीरसागर
- कोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा : दोन लाखावर लोक जमतील
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बेळगाव दौऱ्यात बदल
- दोन भावांचे मृतदेह सापडल्याने खळबळ