प्रतिनिधी /खानापूर
गणेशोत्सवानिमित्त लोंढय़ात पोलीस खात्याच्यावतीने शांतता समितीची बैठक पार पडली.यावेळी खानापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शरणेश जॅलीहाळ यांनी गणेशोत्सव शांततेत पार पाडावा, याबद्दल मार्गदर्शन केले. तसेंच गणपती मंडळांनी उत्सवासंदर्भात लागणाऱया परवानग्या योग्य वेळेत घ्याव्यात, तसेच सामाजिक शांतता बिघडणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, याबाबत लोंढा परिसरातील गावातील गणपती मंडळाच्या अध्यक्ष व मंडळाच्या पदाधिकाऱयानी जबाबदारीचे भान ठेवून वागावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी लोंढा परिसरातील मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी बाबुराव देसाई, जयंवत नाईक, मारुती गावडे, अजीम गडद, पवन संपगावकर, भरत हंडी, नागराज उपसकर यांनी आपले विचार व्यक्त केले. जयराम यांनी आभार मानले.