अनुजा कुडतरकर
सावंतवाडी शहरात प्रवेश केल्यावर नजरेस पडतो तो सुंदर असा मोती तलाव ! केवळ सिंधुदुर्गातीलच नव्हे तर परराज्यातील पर्यटकांना हा तलाव खुणावत असतो . मराठी चित्रपटसृष्टीलाही या मोती तलावाची भुरळ न पडली तरच नवल. पावसाळ्यात हा तलाव तुडुंब भरतो . जसजसा उन्हाळा जवळ आला की तलावातील पाणी कमी व्हायला सुरुवात होते . परंतु या वर्षी तलावातील गाळ काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ झाला आणि त्यासाठी तलावातील पाणी आटवण्यात आलंय. जरी उन्हाचा पारा वाढला असला तरी मोती तलावातील पाणी पूर्णतः कधीही आटत नाही . परंतु गाळ काढण्याच्या कामामुळे तलावातील पाणी पूर्णतः आटवण्यात आलंय . त्यामुळे जे पक्षी मोती तलावाच्या पाण्यावर अवलंबून होते त्यांचे पाण्याविना हाल होतायत . कडाक्याच्या उन्हात पाणी न मिळाल्यामुळे पक्षी पाण्याच्या शोधात आहेत !