कोल्हापूर : सामाजिक सलोखा हा कोल्हापूरचा गाभा आहे. आपल्या लोकशाहीला 75 वर्षे झाली आहेत आणि आपण नवीन युगात राहतोय. अशा वेळेस आपल्या पूर्वजांच्या विचार आणि त्यांच्या शिकवणी आपल्या डोळ्यासमोर असणे गरजेचे आहे. असे प्रकार यापूर्वी कधी झाले नव्हते. त्यामुळे याच्या मुळापर्यंत जाण्याबरोबर सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन शाहू छत्रपती महाराज यांनी केले.
तसेच सर्वात पहिला सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी शासनाची आणि गृहखात्याची असते. त्यांनी या संबंधित सर्व रिपोर्ट घेतले पाहिजे आणि अशा घटना परत होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. आधी संभाजीनगर, नाशिक, आता कोल्हापूर याचा अभ्यास करून याची लिंक आहे की सर्व वेगवेगळ्या आहेत का याकडे पाहिले पाहिजे. पोलिसांनी आता यापुढे सतर्क राहिले पाहिजे आणि त्यांची जी तपास यंत्रणा असते ती जास्त ऍक्टिव्ह व्हायला हवी.
काल जिल्हाधिकारी, एसपी आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांना बोललो होतो की काही गरज वाटली तर मी स्वतः रस्त्यावर येऊन लोकांना शांत राहा सांगायला तयार आहे. मात्र त्यांना कदाचित आवश्यकता वाटली नसावी. हे प्रकरण फास्ट ट्रॅक वर झाले पाहिजे आणि कायदेशीर शिक्षा व्हायला हवी
लोकांना आपला इतिहास माहिती असायला हवा आणि आपल्याला काय स्टेटस लावायचे याबाबत काळजी घ्यायला हवी. माझ्यासह सर्वजण या व्हिडिओ नंतर अपसेट आहेतप्रशासनाला वेळ देण्याची गरज आहे.
हे देवेंद्र फडणवीस यांची अपयश म्हणावे लागेल का यावर शाहू छत्रपती यांचे उत्तर एकाच व्यक्तीला या प्रकरणावर जबाबदार धरणे चुकीचे आहे.
सत्ताधारी आणि विरोधी दोघांनी मर्यादा ठेवाव्यात. अशा दंगलीमुळे लोकांचे हाल होत असतात, याचे भान असले पाहिजे.