#
ऑस्ट्रेलियाविऊद्ध खेळताना त्यांची स्पर्धात्मकता आणि उच्च पातळीचे कौशल्य यामुळे आपल्याला अधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते, असे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने म्हटले आहे. ‘ऑस्ट्रेलियाचा संघ हा खूप स्पर्धात्मक आहे. जर तुम्ही त्यांना एक छोटीशी संधी दिली तर ते आक्रमण करून तुमच्यावर वर्चस्व गाजवतील. त्यांचे कौशल्य खरोखर उच्च पातळीचे आहे. त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध मला जास्त प्रेरणा मिळते आणि मला माझा खेळ अधिक वरच्या स्तरावर न्यावा लागतो. ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी मला माझा खेळ उंचवावा लागेल’, असे विराटने जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या आधी ‘स्टार स्पोर्ट्स’ दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे.
विराटला ऑस्ट्रेलियाविऊद्ध खेळायला खूप आवडते. ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या 24 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 48.26 च्या सरासरीने आठ शतके आणि पाच अर्धशतकांसह 1979 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 186 आहे. ऑस्ट्रेलियाविऊद्ध सर्व प्रकारच्या क्रिकेटचे 92 सामने विराट खेळला आहे. त्यामध्ये त्याने 50.97 च्या सरासरीने 4945 धावा केलेल्या असून एकूण 16 शतके आणि 24 अर्धशतके झळकावलेली आहेत.
मात्र विराटच्या मते, ओव्हलवरच्या अंतिम सामन्यातील परिस्थिती कठीण असेल. ‘आम्हाला पाटा खेळपट्टी मिळणार नाही आणि फलंदाजांनी सावध राहण्याची गरज आहे. आम्ही अधिक लक्ष केंद्रित करणे आणि परिस्थितीशी तसेच वातावरणाशी जुळवून घेणे आवश्यक आहे. फलंदाजी करताना आम्हाला अधिक लक्ष देण्याची आणि शिस्तीची गरज भासेल, असे तो पुढे म्हणाला. ‘इंग्लंडमधील सीम आणि स्विंग गोलंदाजीला अनुकूल परिस्थितीतील सर्वांत कठीण भाग हा कुठला चेंडू हाणायचा, कुठल्या चेंडूवर बचाव करायचा आणि कुठला सोडून द्यायचा ते ठरविण्याचा आहे. तेथे भक्कम तंत्राने खेळणे महत्त्वाचे आहे. शिवाय फलंदाजी करताना समतोल राखणे खूप गरजेचे आहे, असे मत विराटने व्यक्त केले.
जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता ही महत्त्वाची बाब ठरणार असल्याचे विराटने सांगितले. जो संघ परिस्थितीशी, खेळपट्टीशी जुळवून घेण्यास सक्षम असेल तो सामना जिंकेल, असे त्याने म्हटले आहे. विराटने यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैदानावरील वैराबद्दलही मत व्यक्त केले. ‘सुऊवातीला भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात शत्रूत्व दिसायचे. पण आम्ही ऑस्ट्रेलियात दोन कसोटी मालिका जिंकल्यानंतर शत्रुत्वाचे ऊपांतर आदरात झाले आहे. आता जेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियाविऊद्ध खेळतो तेव्हा भारताने त्यांना लागापोठ कसोटी मालिकांत पराभूत केल्याच्या जाणीवेतून येणारा आदर दिसून येतो’, असे त्याने सांगितले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 106 कसोटी सामने झाले आहेत. भारताने 32 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 44 सामन्यांत विजय मिळवलेला आहे. 29 सामने अनिर्णित राहिलेले आहेत आणि एक ‘टाय’ झालेला आहे. गेल्या काही वर्षांत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटी मालिका जिंकल्यामुळे आणि मायदेशात त्यांच्यावर वर्चस्व गाजविल्याने भारताच्या कामगिरीत सुधारणा झालेली आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के. एस. भरत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन. राखीव खेळाडू-सूर्यकुमार यादव, मुकेश कुमार आणि यशस्वी जैस्वाल.