सावंतवाडी / प्रतिनिधी
तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत आणि कॅबिनेट मंत्री दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाने सरपंच सौ. वैदेयी रामा देसाई व ग्रामपंचायत सदस्य यांच्या कार्यकाळात मंजूर करुन आणलेली डेगवे पानव्हळ वराडकरवाडी मार्गे मोयझरवाडी तांबुळी रस्त्या पर्यंत खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले .तसेचडेगवे हरिजनवाडी ते श्रीधर देसाई यांच्या घराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण केले ही कामे सामंत आणि केसरकर यांच्यामुळेच झाली. त्याचे श्रेय कुणी घेऊ नये असे शिवसेनाविभागप्रमुख विजय देसाई यांनी स्पष्ट केले आहे.