राज्यातील राजकारणात महाविकास आघाडीमध्ये नाराजीनाट्य सुरु असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे महाविकास आघाडीवर नाराज असून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याचदरम्यान, वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या दाव्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. येत्या 15 दिवसांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात २ मोठे बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होणार असल्याचे सांगताना प्रकाश आंबेडकर म्हणाले “येत्या 15 दिवसानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बॉम्बस्फोट होणार असून 1 नाही तर 2 बॉम्बस्फोट असतील. ठाकरे गटासोबत वंचितच्या पदाधिकारी पातळीवर बैठका सुरू असून आमच्या युतीची काळजी विरोधकांनी करू नये.” असा दावा प्रकार आंबेडकर यांनी केला आहे.
पुलवामा हल्ल्याबाबत धक्कादायक खुलासा करणाऱ्या जम्मू आणि काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या विधानावर भाष्य करथाना आंबेडकर म्हणाले, “पुलवामाविषयी त्यावेळीही मी बोललो होतो, जी गाडी ब्लास्ट केली गेली त्याला प्रोटेक्शन नव्हतं. यासारखी माहिती मला मिळते तर सरकारलाही का मिळू शकत नाही. पण सरकारला राजकारण करायच होतं. दहा गाड्या कॅनॉव्हबद्दलची साधी बाब कॉन्स्टेबलला माहिती आहे, ती बाब सरकारला माहिती नसून याची साधी चौकशी सुद्धा झाली नाही. त्यामुळे राजकारणासाठी या जवानांचा बळी दिला गेलाय का?” असा प्रश्नही प्रकाश आंबेडकरांनी विचारला.