प्रतिनिधी / खानापूर : खासगी बस पलटी झाल्याने काहीजण जखमी झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील ओलमनी गावात घडली आहे.
लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी बसमधून व्हराडी निघाले होते. गोव्याच्या मडगांवहुन हे प्रवासी बैलूरला जात होते. पण पहाटे साडेचारच्या दरम्यान नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. याबाबतची अधिक माहिती अशी की खाजगी बस क्रमांक जीए -07 एफ 88 33 गोवा -मडगाव येथून लग्नाचे वराड घेऊन चोरला मार्गे कित्तूर तालुक्यातील बैलूर या गावी निघाली होती मात्र चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने सदर बस जांबोटी- खानापूर राज्य महामार्गावर ओलमनी गावाजवळ सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान पलटी होऊन सुमारे 25 जण जखमी झाले आहेत सदर बस रस्त्याकडेला असलेल्या शेतवडीत दोन वेळा पलटी झाल्यामुळे बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अपघातानंतर ताबडतोब 108 रूग्ण वहीकेला पाचारण करून जखमींना प्राथमिक उपचारासाठी खानापूर सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आल्याचे समते जखमीमध्ये महिला व लहान मुलांचा अधिक समावेश आहे