तुंबलेल्या गटारीमुळे शनि मंदिरसमोर साचले सांडपाणी
वाहत्या पाण्यामुळे रस्त्यावर खड्डे : गटारीची स्वच्छता करण्याची मागणी
शनि मंदिर समोरील गटार तुंबल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. पावसाचा जोर वाढल्यानंतर रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहत्या पाण्यामुळे रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. येथील गटारीची स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.
शहर स्वच्छतेबरोबरच गटारीतील कचरा काढण्यासाठी महापालिकेकडून कोटय़वधीच्या निविदा काढल्या जातात. मात्र केवळ कचऱयाची उचल करून गटार स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी स्वच्छतेसाठी खर्ची घालण्यात आलेला निधी वाया जात असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. शहरातील कोणत्याच गटारींमधील कचऱयाची उचल केली जात नाही. नागरिकांनी तक्रार केल्यास काही मोजक्मयाच ठिकाणी स्वच्छता करण्याचे नाटक केले जाते. त्यामुळे शहरातील बहुतांश गटारी कचऱयाने तुंबल्या आहेत.
महापालिकेच्या कामकाजाचा नमूना पावसाळय़ात चव्हाटय़ावर येतो. शहरातील अनेक गटारी तुडूंब भरल्या असून पावसाचे पाणी गटारींऐवजी रस्त्यांवरून वाहत आहे. शनि मंदिरसमोर असलेली गटार पूर्णपणे तुंबली असून सांडपाण्याचा निचरा होत नाही. यामुळे येथील रस्त्यावरून सांडपाणी वाहते.
ये-जा करणाऱया वाहनांमुळे पादचारी आणि दुचाकीधारकांच्या अंगावर सांडपाणी उडत आहे. तसेच याठिकाणी खड्डा निर्माण झाल्याने साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नाही. परिणामी अपघात घडत आहेत. येथील गटारीची स्वच्छता करून समस्येचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.
शिवाजी रोडवर धोकादायक खड्डे
खड्डे बुजविण्याबरोबरच ड्रेनेज चेंबर बांधण्याची नागरिकांची मागणी
शिवाजी रोड-कोनवाळ गल्लीला जोडणाऱया परिसरात कोसळलेल्या नाल्याच्या बांधकामाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. अशातच या ठिकाणी डेनेज चेंबर खचले असून वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. नाल्याशेजारून कोनवाळ गल्लीकडे जाणाऱया रस्त्यावर हा खड्डा निर्माण झाल्याने नागरिकांनादेखील धोकादायक बनला आहे.
मुजावर गल्ली परिसरात निर्माण झालेला खड्डा म्हणजे ड्रेनेजचे चेंबर आहे. चेंबर खचल्याने वाहनधारकांना अडचणींचे ठरत आहे. पाटील गल्लीहून टिळक चौकात येण्यासाठी शिवाजी रोडचा वापर केला जातो. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. पण या रस्त्याशेजारील ठिकठिकाणी कचरा टाकलेला असतो. तसेच कचरा टाकण्यात येणाऱया ठिकाणी खड्डा निर्माण झाला आहे. ड्रेनेज चेंबर खचल्याने दुर्गंधी पसरली आहे.
तसेच पाटील गल्लीच्या कॉर्नरजवळ नाल्यालगत रस्ता खचल्याने वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली होती. पण याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी खड्डय़ांच्या भोवती दगड लावण्यात आले आहेत. पण या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याबरोबर डेनेज चेंबर बांधण्याकडे मनपाचे अधिकारी लक्ष देतील का? अशी विचारणा होत आहे.
कणबर्गी रोड सायकल ट्रकवर घाणीचे साम्राज्य
ट्रकचा वापर रात्रीच्यावेळी होतोय मद्यपानासाठी
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कणबर्गी रोडचा विकास करून सायकल ट्रक व विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र देखभालीअभावी रस्त्यांची दुरवस्था होत आहे. सायकल ट्रकवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, याचा उपयोग रात्रीच्यावेळी मद्यपानासाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सायकल ट्रकसाठी खर्ची घालण्यात आलेला निधी वाया गेला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
कनकदास चौक ते कणबर्गीपर्यंतच्या रस्त्याचा विकास करण्यात आला आहे. ऑटोनगरपर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा फुटपाथ आणि सायकल ट्रक बनविण्यात आले आहेत. हा रस्ता वाहनधारकांसाठी व्यवस्थित बनविण्यात आला असून, मध्यभागी दुभाजक घालून पथदीपांचे खांबदेखील बसविण्यात आले आहेत. पण पथदीप बसविण्यात आले नसल्याने या खांबांना पथदीपांची प्रतीक्षा आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे सायकलस्वारांसाठी सायकल ट्रक निर्माण करण्यात आले आहेत. पण रस्त्याची देखभाल व्यवस्थित केली जात नाही. तसेच कचऱयाची उचल देखील वेळेवर होत नाही. त्यामुळे याठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली असून, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
महांतेशनगर परिसरात रात्रीच्यावेळी सायकल ट्रकचा वापर मद्यपानासाठी केला जात आहे. त्यामुळे सायकल ट्रकवरच मद्याच्या बाटल्या टाकण्यात आल्या आहेत. तसेच सायकल ट्रकवर ठिकठिकाणी चिखल झाला आहे. तसेच पाणी साचल्याने रस्त्याचा वापर केला जात नाही. पण सायकल ट्रक निर्माण करण्यासाठी कोटीचा निधी खर्च करण्यात आला आहे. या ट्रकचा वापर वाहने पार्क करण्यासाठी आणि फेरीवाल्यांसाठी होत आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी खर्ची घालण्यात आलेला निधी वाया गेला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत..
यंदेखूटला कचऱयाचे ग्रहण
महानगरपालिका-कॅन्टोन्मेंटचे दुर्लक्ष,कचरा त्वरित हटवण्याची मागणी
बेळगाव शहरातील महत्त्वाचे प्रवेशद्वार असणाऱया आणि सतत गजबजत राहणाऱया यंदेखूटला कचऱयाचे ग्रहण लागले आहे. मागील अनेक वर्षांपासून हे ग्रहण सुटता सुटत नाही. त्यामुळे याला कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या ठिकाणी वारंवार कचऱयाचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी आता तातडीने प्रयत्न होण्याची गरज आहे.
यंदेखूट परिसराला अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे. या समस्येतून यंदेखूट कधी एकदा मोकळा श्वास घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे. येथून प्रवास करताना नागरिकांना नाकावर हात ठेवून प्रवास करावा लागतो. ही समस्या सोडविण्याकडे महानगरपालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डचे दुर्लक्ष होत असून येथील कचरा हटवावा, अशी मागणी होत आहे.
यंदेखूट हे सतत वर्दळीचे ठिकाण असणारी जागा. या ठिकाणावरून दररोज शेकडो नागरिक प्रवास करत असतात. या रस्त्यावरून चंदगडसह गोवा व इतर तालुक्मयातील नागरिक दररोज ये-जा करत असतात. मात्र मुख्य प्रवेशद्वारावरच कचरा फेकण्यात येत असल्याने समस्या निर्माण झाली आहे. वनिता विद्यालयासमोरील यंदेखूट येथे हा कचरा साचला आहे. याआधीही येथे कचरा साचत असल्याने विद्यार्थ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत होता. याची तक्रार संबंधितांकडे करण्यात आली. मात्र अजूनही या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिसरातून प्रवास करताना नागरिक नाकावर हात ठेवूनच प्रवास करताना दिसत आहेत. मागील अनेक दिवसांपासून हा कचरा येथेच पडल्याने समस्या निर्माण होत आहे तर अनेकांचे आरोग्यही धोक्मयात येण्याची शक्मयता नाकारता येत नाही. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील कचरा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.