निवडणूक आयोगाने घेतले महत्त्वाचे निर्णय : मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा हेतू
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 500 हून अधिक कर्मचारी असलेल्या शासकीय विभागांच्या कर्मचाऱयांचे मतदान सुनिश्चित करण्यासाठी नोडल अधिकाऱयाची नियुक्ती करावी लागणार आहे. या निर्णयामुळे मतदान सोडून इतरठिकाणी फिरायला जाणाऱया शासकीय कर्मचाऱयांवर अंकुश येणार आहे. तर दुर्गम ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांवर सेवा बजावणाऱया निवडणूक कर्मचाऱयाला दुप्पट मानधन मिळणार आहे.
आगामी निवडणुकीत मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी दुर्गम मतदान केंद्रांचा दौरा करतील. आयोगाने देशातील 440 दुर्गम मतदान केंद्रांची ओळख पटविली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या दुर्गम मतदान केंद्रांवरील दौऱयानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
निवडणुकीत मतदान करण्यासाठी मिळणाऱया सुटीचा योग्य वापर करविला जाणार आहे. 500 हून अधिक कर्मचारी असलेल्या शासकीय विभागात नोडल अधिकाऱयाची नियुक्ती करावी लागणार आहे. यामुळे निवडणुकीत कुणी मतदान केले आणि कुणी नाही हे समजणार आहे.
शासकीय विभागांना नोडल अधिकारी नियुक्त करावा लागणार आहे. सर्व अधिकारी-कर्मचारी मतदानासाठी मिळालेल्या सुटीचा वापर मतदानासाठी करतील हे निश्चित करावे लागणार आहे. तर जिल्हा निवडणूक अधिकारी सर्व विधानसभा मतदारसंघांमधील सर्वात कमी मतदान होणाऱया 5 केंद्रांचा दौरा करणार आहेत. मतदान कमी का होते हे जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.