मंत्री रोहन खंवटे यांचे विरोध पक्षनेते मायकल लोबोंना आव्हान
प्रतिनिधी /म्हापसा
आज आम्ही सरकारात आहोत, त्यावेळी मायकल लोबो सरकारात होते. आजही सरकार तेच आहेत. त्यांनी काय केले आहे, काय नाही ते समोर आले आहे. पर्रा, कळंगूट, पर्वरी, गिरवडे, शिवोलीत काय चालले आहे ते सर्वांना माहीत आहे. प्रश्न विरोधकांचा नाही. सरकारला त्यात काहीतरी बेकायदेशीर आढळले म्हणूनच सरकारने कारवाई केली असेल. जर त्यात काही गैरकृत्य, बेकायदेशीर नसेल तर त्यांनी ते सिद्ध करावे. मला वाटते यामागे काहीच राजकारण नाही. गोव्याचे अस्तित्व राखायचे असेल तर थोडी पावले आम्हाला उचलावीच लागणार, अशी प्रतिक्रिया पर्यटन तथा आयटीमंत्री रोहन खंवटे यांनी म्हापसा येथे तरुण भारतशी बोलताना दिली.
नगर नियोजन मंत्र्याकडून सुडाचे राजकारण चालले आहे, असे विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांचे म्हणणे आहे. याबाबत मंत्री खंवटे यांच्याशी चर्चा केली असता विचारली असता त्यानी प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले, डोंगर कापणी प्रक्रियेत जे कोण गुंतले आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. जी काही कारवाई चालली ती योग्य आहे, असे म्हणावे लागेल. त्यामुळे नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे.
विरोधी पक्ष नेते मायकल लोबो जे काही केले ते चूक दिसल्यास त्यांनी सिद्ध करून दाखवावे. हा राजकीय सुड आहे, असे आपण म्हणू शकत नाही. मी पर्वरी आमदार होतो काय झाले आहे. हे सर्वांना माहीत आहे. यापूर्वी कुणी राजकारण केले असेल तर त्यांना हे राजकारण दिसले असेल. काचेच्या घरात राहणाऱयाने दुसऱयाच्या घरावर दगड मारण्याचे धाडस करू नये, असे मंत्री खंवटे म्हणाले.
आयटी विद्यार्थ्यानी नोकरीसाठी विदेशात जाऊ नये
राज्यातील लोक जे विदेशात आहेत, ते राज्यात यावे व ते परत तेथे जाऊ नये. यासाठी नवीन सवलती, संधी तयार करण्यात येणार आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आमचे नवीन आयटी धोरण आहे. पर्वरी येथे हायबीट, तुये नवीन औद्योगिक आयटी पार्कची उभारणी करीत असताना कनेक्टिव्हिटीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आयटी क्षेत्रात पायाभूत सुविधा कमी पडत नाही. धोरण हाती घेतले की, ते पूर्णत्वाकडे नेणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदी, केंद्रीयमंत्री आश्विनी, राज्य सरकार व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्याने आयटी क्षेत्राचा विकास केला जाईल. मुलांना नवीन संधी देणे ही एक राज्यासमोर मोठे आव्हाने आहे. मात्र ते पेलण्यासाठी त्या दृष्टीने राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे, असे मंत्री रोहन खंवटे यावेळी म्हणाले.