पणजी : काव्य हा जगण्याचा भाग मानून निसर्ग आणि माणसाच्या मनाची सांगड घालून कवी विनोद नाईक यांनी मराठी भाषेबरोबरच हिंदी भाषेतूनही काव्यनिर्मिती केली आहे. विनोद नाईक यांची कविता ही नवोदित कवींना लेखनासाठी प्रेरणा देणारी आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश तळवडेकर यांनी केले. पणजी येथील गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे मंडळाच्या सभागृहात विनोद नाईक यांच्या ‘गीतलहर’ या हिंदी कवितासंग्रहाचे प्रकाशन तळवडेकर यांच्याहस्ते करण्यात आले. गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी साहित्यिका माधुरी शेणवी उसगावकर, आनंद पेडणेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. विनोद नाईक यांनी वाचन, चिंतन, मनन करून सकस साहित्य निर्मिती करावी व सातत्याने लिहित रहावे असे आवाहन रमेश वंसकर यांनी केले. विनोद नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. माधुरी शेणवी उसगावकर यांनी स्वागत तर आनंद पेडणेकर यांनी आभार मानले.
Previous Articleपर्येत सिडबॉलची कार्यशाळा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.