कोकण मराठी परिषदेचा उपक्रम,
पणजी : कोकण मराठी परिषदेतर्फे ज्ये÷ गोमंतकीय साहित्यकाला देण्यात येणारा कविकुलगुरू कालिदास पुरस्कार यंदा माधव सटवाणी यांना जाहीर झाला आहे. माधव सटवाणी हे सत्तरी (गोवा) परिसरातील ज्ये÷ साहित्यकि असून, ते प्रामुख्याने कवी म्हणूनच ओळखले जातात.
इंग्रजी वाङ्मय आणि सौंदर्यशास्त्र हे विषय घेऊन एम. ए.आणि एम. एड. असलेले प्रा. सटवाणी यांनी सत्तरी तालुक्मयात 1965 ते 2005 या काळात चार दशके ज्ञानदानाचे कार्य केले आहे. निवृत्तीनंतर सध्या ते पूर्णवेळ लेखन करत आहेत.
त्यांचे ’निमग्न’ (1999) आणि ’एक शुभ्र टिंब’ (2010) असे दोन मराठी कवितासंग्रह असून, 2017 मध्ये ’फिफ्टी एव्हरग्रीन पोएम्स ऑफ माधव सटवाणी’ हा त्यांच्या मराठी कवितांचा मोहनराव कुलकर्णी यांनी अनुवादित केलेला संग्रह प्रकाशित झाला आहे.या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ ताळगाव येथील माधव राघव प्रकाशनने पणजीत आयोजित केला होता.
त्यांनी ललित लेखन, काव्य समीक्षा लेखनही केले आहे. ही दोन्ही पुस्तके तसेच ललितबंध (लेखसंग्रह) आम्ही नाटक शिकतो (बालनाटय़), बा. भ. बोरकरांच्या कविता रसग्रहण तसेच कथासंग्रह आणि कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
त्यांनी 1974 मध्ये साहित्य कलोपासक मंडळाची स्थापना केली आहे. 1982 मध्ये ते या मंडळाचे अध्यक्ष झाले. ’बिल्वदल, साखळी’ या संस्थेतर्फे 3 डिसेंबर, 2013 रोजी आयोजित मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले. त्यापूर्वी 2008 मध्ये वाळपईत भरलेल्या ’युवा मराठी साहित्य समेलना’तील कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. याशिवाय गोव्यात विविध ठिकाणी झालेल्या कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. इचलकरंजी येथील दै. महासत्ता आणि कोल्हापूर येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, महाराष्ट्र गोव्यातील दैनिके तसेच दिवाळी अंकातून त्यांच्या कविता सातत्याने प्रकाशित होत आहेत.
विष्णू सूर्या वाघ यांनी कला अकादमीतर्फे 2016 मध्येआयोजित केलेल्या ’काव्यहोत्र’ या राष्ट्रीय स्तरावरील कविसंमेलनात ते निमंत्रित कवी म्हणून सहभागी झाले होते. त्यांना अकोला महाराष्ट्र येथील ’अंकुर साहित्य संघा’चा ’कवी बी’ साहित्य पुरस्कार बेळगाव येथील ’वाङ्मय चर्चा मंडळा’चा कवी कृ. ब. निकुंब साहित्य पुरस्कार, कुलकर्णी साहित्य प्रति÷ानचा ’शारदीय साहित्य पुरस्कार’, ’बिल्वदल, साखळी’ या संस्थेचा ’पं. महादेव शास्त्री पुरस्कार’, नाशिक येथील ’नाशिक कवी संस्थे’चा ’कुसुमाग्रज पुरस्कार’ तसेच उगवे-पेडणे गोवा येथील ’यशवंत साहित्य राज्यस्तरीय’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. डॉ. साहेबराव खंदारे आयोजित ’आशिएन पोएट्री’ या विश्वव्यापी ऑनलाईन कविसंमेलनासाठी त्यांच्या दोन कवितांची निवड झाली आहे.
अडवई -सत्तरी, गोवा येथील नेताजी सुभाषचंद्र युवक मंडळ, बेळगाव येथील ’माय मराठी संघा’तर्फे 2014 मध्ये, 2018 मध्ये वाळपई सार्वजिनक गणेशोत्सव मंडळातर्फे, 2019 मध्ये वाळपई येथील गोमंतक मराठी साहित्य परिषदेतर्फे त्यांचे सत्कार व गौरव झालेले आहेत.