शहरपातळीवर मतदार जनजागृती, सर्वपक्षीय व्यापक बैठक
राधानगरी/प्रतिनिधी
राधानगरी शहराला नगरपंचायतिचा दर्जा मिळावा या मागणीसाठी येथील अंबाबाई मंदिरात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीला राधानगरीकारांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
नुकताच ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने राधानगरीला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा यासाठी सर्व स्तरावर सर्व पक्षीय कृती समितीचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार मतदार संघाची पुर्नरचना, फेररचना करणे कठिण असल्याने राधानगरी ग्रा. प. ची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे शहरवासीयांनी या बैठकीत शहरातील सर्व मतदारांनी निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घालावा असे मत व्यक्त केले.
त्यासाठी मतदार जनजागृती आवश्यक आहे. जनसामान्यांना आपली भूमिका पोहचवावी व यास पाठींबा द्यावा, म्हणून पहिला टप्पा म्हणून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दि. २१ नोव्हेंबर रोजी राधानगरी शहर बंद ठेवण्यात यावे, असा निर्णय या सर्व पक्षीय बैठकीत घेण्यात आला आहे, तरी शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, भगिनी, शेतकरी, जेष्ठ नागरिक, सर्व तरुण मंडळे, महिला मंडळे आदी सर्व घटकांनी या बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या बैठकीस अभिजित तायशेटे, सुधाकर साळोखे, संभाजी आरडे, दीपक शेट्टी, विजय महाडिक, रमेश पाटील (बचाटे) यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते