2015 मधील घटना 8 वर्षांनंतर लागला निकाल
चिपळूण प्रतिनिधी
चिपळूण येथे जमिनीच्या वादातून मित्राचा गळा चिरून निर्दयीपणे खून केल्याचा आरोप असलेल्या 6 जणांना सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 2015 मध्ये घडलेल्या या घटनेचा 8 वर्षानंतर न्यायालयाने निकाल दिला. एकाच गुन्ह्यातील 6 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याची चिपळूणमधील ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे. निकालावेळी एक आरोपी गैरहजर राहिल्याने त्यास अटक करण्याचे आदेश यावेळी न्यायालयाने दिले.
चिपळूण सत्र न्यायाधीश एम.एस. मोमीन यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारी पक्षाकडून ॲड. पफुल्ल साळवी यांनी न्यायालयापुढे युक्तीवाद केला. जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींमध्ये दीपक वामन आंब्रे (40, आवाशी), उमेश चंद्रसेन आंब्रे (34), विक्रमसिंह भागसिंग मेश्राम (34, मुळ मध्यप्रदेश, सध्या लोटे घरडा काॅलनी), सागर पाटील (35, पटवर्धन लोटे), संदीप हारीश्चंद्र आंब्रे (45) उमेश नारायण आंब्रे (45 आवाशी-खेड) आदींचा समावेश आहे.
खटल्यातील माहितीनुसार, खेड तालुक्यातील आवाशी-देऊळवाडी येथील ओंकार तुकाराम कदम (25) याचा 31 मे 2015 रोजी खून झाल्याचे समोर आले होते. याबाबतची तक्रार त्याचा भाऊ समीर तुकाराम कदम याने चिपळूण पोलीस स्थानकात दिली होती. या खूनप्रकरणी दीपक वामन आंब्रे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. चिपळूणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला होता.
खूनाच्या दोन दिवस आधी 28 मे 2015 रोजी दीपक आंब्रे व ओंकार कदम यांच्या वादग्रस्त जमिनीच्या सीमेवर असलेल्या चिंचेच्या झाडाच्या फांद्या तोडल्याच्या कारणावरुन वाद निर्माण झाला होता. तसेच त्या आधीही दीपक आंब्रे याने ओंकार कदम यास घरासमोरील पडवीवर पत्रे टाकण्यास हरकत घेतली होती. या वादाविषयी ओंकार कदम याने खेड पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. त्यावेळी दीपक आंब्रे व त्याच्या सहकाऱ्यांनी माफीनामा लिहून दिला होता. त्यानंतर दोन दिवसांनी त्याचा मित्र उमेश चंद्रसेन आंब्रे याने ओंकार कदम याला पार्टीचे कारण सांगून परशुरामजवळील हाॅटेल ओमेगाच्या मागे बोलावून घेतले. त्या ठिकाणी दीपक आंबे याच्यासह उमेश आंब्रे, विक्रमसिंग मेश्राम, सागर पाटील अशा चौघांनी ओंकारचे हात-पाय पकडले तर दीपक आंब्रे याने त्याचा सुरीने गळा चिरला. तसेच जांभ्याचा दगड चेहऱ्यावर घातला आणि छाती व पोटावर वारही केले.
यानंतर खूनाचा पुरावा नष्ट व्हावा, यासाठी त्या ठिकाणच्या जंगलमय भागात मृतदेह लपवून ठेवण्यात आला होता. त्यानंतर मृतदेह मॅक्झिमो गाडीत भरुन चिपळूण येथील एनराॅन पुलावरुन वाशिष्ठी नदीत टाकण्यात आला. तसेच ओंकारची दुचाकी पिंपळी येथील काॅनलमध्ये फेकण्यात आली.
चिपळूण पोलिसांकडून खूनाचा तपास सुरु असताना 1 जून 2015 रोजी पिंपळी येथे दुचाकी तसेच 2 मोबाईल, ओंकारचा शर्ट व सुरी आढळून आली. त्यानंतर दुपारी 3 वाजता वाशिष्ठी नदीपात्रात ओंकारचा मृतदेह आढळून आला. तत्कालीन पोलीस निरीक्षक मकेश्वर यांनी हाॅटेल ओमेगामागील जंगलात पाहणी केली असता ओंकारचे चार दात, रक्ताचे डाग असलेले दोन जांभ्यांचे दगड आढळले. या प्रकरणी दीपक आंब्रे याच्यासह सहाजणांना अटक करण्यात आली. त्यातील 5 जणांची जामिनावर सुटका झाली होती तर दीपक आंब्रे हा अटकेतच होता.
या प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक मकेश्वर यांनी सखोल तपास करत न्यायालयापुढे दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान तब्बल 37 साक्षीदारांची साक्ष न्यायालयापुढे नोंदवण्यात आली. या प्रकरणी गेले 8 दिवस येथील आतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात युक्तीवाद सुरु होता. न्यायालयाने पारिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य मानून कलम 302, 121 ब सह 34 अन्वये वरील सहाजणांना आजन्म कारावासाची शिक्षा व प्रत्येकी 10 हजाराचा दंड सुनावण्यात आला. दंड न भरल्यास आण खी 6 महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल देतेवेळी आरोपी वक्रमसिंग भागसिंग मेश्राम हा गैरहजर होता. त्यास अटक करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. यावेळी पैरवी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक चव्हाण यांनी काम पाहिले.
वादग्रस्त जमिनीवरील चिंचेच्या झाडाची फांदी तोडल्याने माझ्या मुलाचा खून कट रचून करण्यात आला. या प्रकरणी आपल्या मुलाला न्याय मिळावा, यासाठी आपणही 8 वर्षात एकदाही तारीख चुकवली नाही. सतत पाठपुरावा केला. तत्कालीन पोलीस निरीक्षक नरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी चहूबाजूंनी तपास केला आणि सरकारी वकील पफुल्ल साळवी यांनी भक्कमपणे न्यायालयात बाजू मांडली. त्यामुळे अखेर सत्याच्या बाजूने आम्हांला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया मृत ओंकार कदम यो वडील तुकाराम कदम यांनी दिली.मित्राच्या खून पकरणी 6जणांना जन्मठेप!