प्रतिनिधी/रत्नागिरी
मागील सरकारच्या आठमुडे धोरणामुळे रिफायनरी पकल्पाला खिळ बसली होती. मात्र आता राज्यात भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पाला चालना मिळेल. लवरकर रिफायनरी प्रकल्प पूर्णत्वास जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रीय गृहराज्य मंत्री अजयकुमार मिश्रा कोकण दौऱ्यावर होते. सकाळी 9.15 वा. ते राजापूर तालुक्यातील गोठणे दोनिवडे येथे त्यांची अनुसूचित जाती जमातीच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतली. सकाळी 11.30 वा. लांजा तहसील गोडाऊन येथे शासकीय गोदाम, पोषण आहार साठवणुकीचा आढावा घेतला.
त्यानंतर ते देवरुखला रवाना झाले. दुपारी देवरुखमधून निघून सायंकाळी 4 वा. ते जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीच्या बैठकीत विविध योजना व विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर 5.30 वा. भाजपाच्या जिल्हा संपर्क कार्यालयात केंद्र सरकारच्या विविध योजना व विकासकामांची माहिती पत्रकारांना दिली.
सायंकाळी 6 वा. त्यांची जिल्हा प्रशासनासंबंधी महत्त्वाची बैठक झाली. मिश्रा सायंकाळी 6.30 वा. वकील, डॉक्टर्स आदींशी शासकीय विश्रामगृह येथे संवाद साधला. पत्रकार परिषदेत त्यांनी पुढे विश्वास व्यक्त केला की भविष्यात रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये भाजपाचे खासदार व आमदार निवडून येतील. रत्नागिरी विमानतळाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. काही सुरक्षेच्या बाबी आहेत. त्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. लवकरच विमानतळाचे काम पूर्ण होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दोन महिन्यात रत्नागिरी व सिधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बीएसएनएलच्या 4 जी सेवेला प्रारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आकशवाणी व दुरदर्शनच्या सेवा रत्नागिरीत बंद का झाल्या आहेत त्यांची माहिती घेऊन त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची हमी त्यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक शिवसेना व भाजपा एकत्र लढली होती. जनतेने भाजपा शिवसेनेला बहुमत दिले मात्र शिवसेनेने विश्वासघात करत भाजपाच्या पाठीत खजीर खूपसला. उध्दव ठाकरेंनी स्वार्थाने युती तोडली व ते स्वत मंत्री बनण्यासाठी युती तोडण्यात आली हे उध्दव ठाकरे व संजय राऊत याचे कारस्थान होते. बिहार मध्येही जेयुडीच्या सोबत भाजपाने युती केली भाजपाच्या सर्वाधिक सीट असतानाही जेयुडीच्या मंत्री बसवण्यात आला. असे असतानाही जेडीयुने बिहारमध्ये भाजपासोबत असलेली युती तोडली आहे. भाजपा कोणत्याही पकारे छोटे पक्ष संपवत नाही आहे असे ही त्यांनी सांगितले. भाजपाला जेयुडी व शिवसेनेने धोका दिला आहे. भाजपाने कोणलाही धोका दिलेला नाही.
रत्नागिरी जिल्ह्यात 1 लाखापेक्षा जास्त आयुष्यमान योजनेची सुवर्ण कार्ड देण्यात आली आहेत. जिल्ह्यात किसान सन्मान योजनेचे 2 लाख 13 हजार शेतकऱ्यांना फायदा देण्यात आला आहे. हर घर शौचालय, ग्रामीण सडक योजना आदी सारख्या महत्वपूर्ण योजना सरकार राबवत आहे. मधल्या काळात उध्दव ठाकरे सरकारने या योजना बंद केल्या होत्या त्या आता पून्हा सुरू होतील.
ईडीची कारवाई ही योग्यच आहे. आठ वर्षात 1 लाख करोड पेक्षा जास्त संपती, रोकड जप्त केली आहे. हा पैसा कुठुन आला. काँग्रेस पार्टीने एजीएल या त्यांच्या पेपरला 90 कोटी कर्ज वाटप. एजीएल पेपरच्या 5 हजार कोटीची संपत्ती असताना त्यांना हे कर्जवाटप कशासाठी. यंग इंडिया या नवीन कंपनी मार्फत काँग्रेस अर्थिक घोटाळा केला आहे. त्यामुळे सोनीया गांधी व राहुल गांधी अडचणीत आले आहेत. इडीची कारवाई योग्य पकारे होत आहे.
महाराष्ट्रातील सरकार हे आपला कालावधी पूर्ण करेल. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने हे सरकार कोसळेल अशी विधाने विरोधत करत आहे. केंद्रात व राजयात आता भाजपाचे सरकार असल्याने विरोधकांमध्ये निराशा पसरली आहे. ते हताश झाल्याने अशी विधाने करत आहेत. या बैठकीला भाजपा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने, बाबा परुळेकर, सचिन
वहाळकर, उमेश कुलकर्णी, सचिन करमरकर आदी उपस्थित होते.