महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी दौरा गुरूवारी पार पडल़ा यामध्ये अनेक कार्यक्रम पार पडल़े सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारी योजनांचा उपयोग करून घेण्याची हातोटी यानिमित्ताने लोकांच्या समोर आल़ी सतत लोकांमध्ये असणारा नेता ही प्रतिमा अधिक दृढ होण्यासाठी कार्यक्रमाची आखणी होती आणि ती यशस्वीपणे पार पडल़ी
सरकार जनतेच्या घरात आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. ‘सरकार तुमच्या मनातील तुमचे सरकार’ हेच ब्रिदवाक्य घेवून यापुढे काम करताना ‘सरकारी काम सहा महिने थांब’ ही संकल्पनाच हद्दपार करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा शुभारंभ रत्नागिरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. स्वराज्याचे सुराज्य व्हावे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय होते. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्याचा कारभार पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. कोणाला फायदा व्हावा, हा उद्देश डोळ्यासमोर न ठेवता शासन जनतेच्या हिताचे निर्णय घेत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर उद्योगमंत्री तथा जिल्ह्dयाचे पालकमंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई, बंदर तथा कृषीमंत्री दादा भूसे उपस्थित होत़े
या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्याहस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना 42 कोटी रूपयांच्या साहित्याचे वितरण करण्यात आले. दिव्यांग लाभार्थ्यांना दुचाकींचे वाटप करण्यात आले. तसेच महिला बचतगटांना निधींचे वाटप, विविध दाखल्यांचे वितरण तर महिला समूहाला व्यवसाय करण्यासाठी टेम्पोचे वितरणही यावेळी करण्यात आले. जिल्हा पोलीस दलाला 10 बोलेरो गाड्यांचे वितरणही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.
रिक्षा हा घटक प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. त्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न यापूर्वीच्या एकाही सरकारने केलेला नाही. त्यांच्या असलेल्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ नाही. मात्र मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रिक्षा व्यावसायिकांची दखल घेतलेली आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र रिक्षा मालक-चालक महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी येत्या 2 दिवसात होणार असल्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केल़े
रत्नागिरी येथील शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या इमारतीचे नूतनीकरण, सुशोभिकरण व आधुनिकीकरण करण्यात आले. या वास्तूचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते गुरूवारी लोकार्पण करण्यात आले. सुमारे साडेचार कोटी ऊपये खर्च कऊन बांधण्यात आलेल्या या देखण्या वास्तूत सुमारे 1 लाख 14 हजार इतकी ग्रंथसंपदा आहे. याचा 50 हून अधिक संशोधक अभ्यासक लाभ घेत आहेत. लोकमान्य टिळक स्मृतीशताब्दीनिमित्ताने पालकमंत्री उदय सामंत यांनी या वास्तूसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सुमारे 5 कोटी उपलब्ध कऊन दिले.
दौऱ्याच्या निमित्ताने रत्नागिरी जिह्यातील सर्वच्या सर्व नऊ तालुक्यातील लाभार्थी एकत्रिकरणाची मोहीम हाती घेण्यात आली होत़ी त्यासाठी शासकीय यंत्रणेने पूर्ण सहकार्य दिल़े ग्रामपंचायत पातळीपासून प्रत्येक क्षेत्रातील लाभार्थी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात सहभागी व्हावेत म्हणून त्यांना ऱा प़ महामंडळाच्या बसद्वारे जिल्हा केंद्र रत्नागिरीत आणण्याची व्यवस्था करण्यात आली होत़ी लाभार्थ्यांच्या येण्याजाण्याचा आणि त्यांच्या आतिथ्याची तजवीत सरकारी यंत्रणेने केली होत़ी यामुळे खूप मोठ्या संख्येने लाभार्थी या कार्यक्रमाला पोहोचले होत़े
भारतीय राजकारणात अलीकडच्या राजकारणात सर्वच राजकीय नेते लांबचे उद्दिष्ठ ठेवून कार्यरत असतात जसे जमेल तसे ठरवलेले उद्दिष्ट जनतेसमोर मांडत असतात़ मुख्यमंत्री एकनाथ fिशंदे यांनी शासकीय योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक कार्यक्रम हाती घेतल़ा तो कार्यक्रम नुसताच पार पाडण्याऐवजी त्याला जाहीर कार्यक्रमाची जोड दिल़ी यामुळे शासकीय योजना आणि शासनातील लोक हे अधिक ठळकपणे लोकांपर्यंत पोहोचल़े
मुख्यमंत्र्यांनी गतीमान प्रशासनाची घोषणा केली, सरकारी काम आणि सहा महिने थांब असा सर्वदूर पसरलेला समज दूर व्हावा म्हणून आपले सरकार प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितल़े एका कार्यक्रमानिमित्ताने मुख्यमंत्र्यांची उद्दिष्ट लोकांसमोर गेली असली तरी कसोटीचा काळ पुढेच आह़े शासकीय यंत्रणेचा कारभार मोठा आह़े विविध खाती जनतेच्या सेवेसाठी राबत असतात़ परंतु शासकीय यंत्रणा तत्पर आह़े, असा अनुभव फारच कमी लोकांना येत असत़ो या अनुभवात बदल घडवण्यासाठी शासकीय यंत्रणेला अधिक जबाबदार बनवावे लागेल़ एखादा अर्ज किंवा प्रकरण सरकारी कार्यालयात सादर केल्यानंतर पाठपुराव्याशिवाय विशिष्ट दिवसात ते निकाली होत आहेत, असा परिपाठ ठेवावा लागेल़ शासकीय कामकाजासाठी उत्तर दायित्वाचा कायदा समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र सरकारने केला होत़ा त्याची अंमलबजावणी फारच अभावाने आढळत आह़े असे असताना मुख्यमंत्री सरकारी यंत्रणेला झटपट प्रतिसाद देणारी व्यवस्था बनवू इच्छित आहेत, ही स्वागतार्ह बाब आह़े परंतु त्यासाठी यंत्रणेतील लोकांची मानसिकता बदलण्याचे मोठे आवाहन स्वीकारावे लागेल़
सरकारी व्यवस्थेतील विलंब हा लोकांना खूपच अडचणीचा वाटतो याची जाण मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल़ी ही मोठी बाब आह़े अडचण लक्षात आली तर त्यावर उपाययोजना करणे शक्य असत़े सरकारी कार्यालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांबाबत कार्यालय प्रमुखाकडून सतत अहवाल घेतले गेले आणि निपटाऱ्याविषयी पाठपुरावा केला तर कामे बऱ्यापैकी मार्गी लागू शकतात़ त्यासाठी क्षेत्रीय अधिकारी उत्साहाने पुढे येणे गरजेचे आह़े हा उत्साह राजकीय व्यवस्थेतेतून दिला जाऊ शकत़ो कोकणातील लोक आपापली गाऱ्हाणे अर्ज, विनंत्यांच्या आधारे करत असतात़
कायदा हातात घेण्याऐवजी निवेदने सादर करणे याला कोकणी माणूस प्राधान्य देत़ो सनदशीरपणा हा कोकणाचा गुणधर्म आह़े त्याला शासकीय यंत्रणेकडून प्रोत्साहन दिले गेले पाहिजे म्हणजे अनुचित बाबींना आपोआप पायबंद बसेल़ लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारे राजकीय नेते सतत शोधले जात असतात़ निवडणुकीद्वारे आकांक्षा पूर्ण करणारे प्रतिनिधी निवडले जात असतात़ एकदा का खुर्चीत बसले की, ठरवलेल्या मार्गाने कारभार करणारे अनेक लोक आहेत पण लोकांच्या आशांना केंद्रबिंदू मानून कारभार करणारे लोकप्रतिनिधी कमी प्रमाणात सापडत आहेत़ मुख्यमंत्र्यांचा संकल्प जनकेंद्री राजकारणाचा असल्याचे त्यांनी घोषित केले आह़े
सुकांत चक्रदेव