इचलकरंजी /प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी दुथडी भरून वाहू लागले आहे. जिल्ह्यातील तीन बंधारे आतापर्यंत पाण्याखाली गेले आहेत.
धरणक्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाटाने वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदीवरील चिंचवाड, रुई, इचलकरंजी हे तीन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे रविवारी मध्यरात्रीपासून पाण्याखाली गेले आहेत. हे तिन्ही बंधारे यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदा पाण्याखाली गेले आहेत. तर रुई बंधारा पाण्याखाली गेला असून पाणी पातळी १,७४३ इतकी दाखवत आहे.