गळती निवारणाकडे एलअँडटी कंपनीचे दुर्लक्ष : गेल्या 15 दिवसांपासून गळती लागल्याने रस्त्याची दुर्दशा, तातडीने दुरुस्त करण्याची मागणी
बेळगाव : शहरातील जलवाहिन्यांच्या गळतीनिवारणाकडे एलअँडटी कंपनीचे दुर्लक्ष झाल्याची टीका नागरिक करीत आहे. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर गांधी चौकात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून गळतीद्वारे पाणी वाहत असल्याने रस्ता खराब झाला आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याने ख•s निर्माण झाले आहेत. य् ााठिकाणी निर्माण झालेल्या ख•dयांमुळे वाहनधारकांना धोका निर्माण झाला असून याकडे एलअँडटी कंपनीचे अधिकारी लक्ष देतील का? अशी विचारणा नागरिक करीत आहेत. लक्ष्मीटेकडी ते राणी चˆमा चौकातील आंबेडकर उद्यानापर्यंतच्या जलवाहिनीला गांधी चौकात गळती लागली आहे. यापूर्वी देखील या ठिकाणी दोनवेळा गळती लागली होती. दोन्ही वेळा दुऊस्ती करूनदेखील अलिकडे पुन्हा जलवाहिनीला गळती लागल्याने पाणी वाया जात आहे. दुऊस्तीचे काम केल्यानंतर वाहनाची ये-जा सुरू असल्याने सातत्याने गळती लागत असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच जलवाहिनीच्या दुऊस्तीसाठी तब्बल तीन महिने येथील रस्ता बंद ठेवण्यात आला होता. तरीदेखील आता पुन्हा गळती लागून रस्ता देखील खराब झाला आहे. गेल्या पंधरा दिवसापासून गांधी चौकातील गळतीद्वारे पाणी वाया जात आहे. याबाबत एलअँडटी कंपनीकडे मौखिक तक्रार करण्यात आली आहे. जलवाहिन्यांच्या देखरेखीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. तरी या कर्मचाऱ्यांचेदेखील याकडे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आले.
पंपिंग स्टेशन ते जलशुद्धीकरण केंद्र आणि मुख्य जलकुंभांना पुरवठा करण्यात येणाऱ्या जलवाहिन्यांची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांकडे सोपविण्यात आली आहे. पण देखभाल केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. गळती लागून पाणी वाहू लागल्याने गांधी चौकातील रस्ता खराब झाला आहे. सतत पाणी वाहत असल्याने रस्त्यावरील डांबर व खडीदेखील उखडली आहे. काही ठिकाणी मोठे ख•s निर्माण झाल्याने वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. बेळगाव- वेंगुर्ला मार्ग महत्त्वाचा असून नेहमी रहदारी असते. अशातच चौकामध्ये ख•ा निर्माण झाला असून त्यामध्ये गळतीचे पाणी साचून राहत आहे. परिणामी त्या ख•dयाचा अंदाज वाहनधारकांना येत नाही. त्यामुळे अपघातदेखील घडत आहेत. या ठिकाणी वाहणारे पाणी वाहनांच्या वर्दळीमुळे दुचाकी तसेच पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे. येथील समस्येकडे एलअँडटी कंपनीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याची तक्रार नागरिक करीत आहे. येथील जलवाहिन्यांच्या दुऊस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.