गटारीचे बांधकाम करून रस्ता रूंद करण्याची मागणी
प्रतिनिधी /खानापूर
संरक्षण खात्याकडून अरगन तलाव परिसरातील खुल्या जागेत कोट्यावधीचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. मात्र नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे अरगन तलावाजवळील भुयारी गटार वाहनधारकांना धोकादायक बनली आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याऐवजी बॅरिकेडस् लावून सुरक्षेची दक्षता घेण्यात आली आहे.
बेळगाव-वेंगुर्ला रोडची पावसामुळे वाताहत झाली असून वाहनधारकांना या रस्त्यावरून ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. विशेषत: अरगन तलाव परिसरातील रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून जावे लागते. त्यामुळे या परिसरातील ख•s बुजविण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून राबविण्यात आली. लक्ष्मी टेकडी परिसरातील दूषित पाणी गटारीद्वारे सोडण्यात येते. सदर पाणी अरगन तलावामध्ये सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे पाणी अरगन तलावामध्ये सोडण्यासाठी कित्येक वर्षापासून गांधी चौकाजवळ भुयारी गटार करण्यात आली आहे. पण भुयारी गटार असलेल्या ठिकाणाचा कठडा वाहनामुळे कोसळला. त्यामुळे याठिकाणी भुयारी गटार असल्याचे वाहनधारकांच्या निदर्शनास येत नाही. या ठिकाणी वाहनांचे अपघात होण्याची दाट शक्मयता आहे.
बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच भुयारी गटार असलेल्या ठिकाणी रस्ता अरूंद असल्याने काही वेळा अवजड वाहने गटारीत अडकतात. या ठिकाणी असलेला कठडा खराब झाल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. भुयारी गटार असल्याचे रात्रीच्यावेळी लक्षात येत नाही. तसेच वळणावर असलेल्या भुयारी गटारीमुळे अपघात घडण्याची अधिक शक्मयता आहे. त्यामुळे भुयारी गटारीचे बांधकाम करून आवश्यक खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावरील ख•s बुजविले, पण भुयारी गटारीबाबत कोणतीच खबरदारी घेतली नाही. केवळ बॅरिकेडस् लावले आहेत. त्यामुळे गटारीचे बांधकाम करून रस्ता रूंद करण्याची मागणी होत आहे.