प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव-सांबरा रोडवर न्यू गांधीनगर नजीक सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. गटारीची व्यवस्था नसल्याने मुख्य रस्त्याच्या बाजुनेच हे सांडपाणी वाहत जात असून, महानगरपालिकेचे मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे या पाfरसरात दुर्गंधी पसरत असून, कायमस्वरूपी गटारीbची निर्मिती करावी अशी मागणी पाfरसरातील व्यापारी वर्गातून होत आहे.
न्यू गांधीनगर येथील लक्ष्मी धाब्यापासून सांबरा रोडवर सांडपाणी वाहत आहे. बेळगाव-हैदराबाद हा मुख्य मार्ग तसेच एअरपोर्टला जाण्यासाठी हा मार्ग असल्यामुळे दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. वाहनांना साईड देताना बर्याचवेळा मोठी वाहने रस्त्याच्या बाजुला असणार्या साईडपट्टीवर घ्यावी लागतात. परंतु न्यू गांधीनगर नजीक साईडपट्टीवरून सांडपाणी वाहत असल्याने वाहनचालकांनाहि वाहने बाजुला घेताना विचार करावा लागत आहे.
न्यू गांधीनगर येथील ब्रिजपासून सांबरारोड पर्यंत हा पूर्णपणे कमर्शियल भाग बनला असून अनेक मोठी आस्थापने या पारिसरात आहेत. या सांडपाण्यामुळे या आस्थाप्नांच्या व्यवसायावर पाfरणाम होत आहे. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होईल अशी पक्क्या गटारांचा बांधकाम करावे अशी मागणी वाहनचालक व व्यापार्यांमधून होत आहे.