०४ ऑगस्ट रोजी कवठेमहांकाळ पोलीस ठाणे हद्दीतील सलगरे गावच्या हद्दीत सलगरे ते अरळीहट्टी तालुका अथणीकडे जाणाऱ्या रोडवर, भावकर लवाण येथे प्रेम संबधाचा राग मनात धरुन संदिप आवळेकर यांची रात्री १०.०० वाजण्याच्या सुमारास धारदार हत्याराने डोक्यात, तोंडावर, हातावर, पोटावर, पायावर वार करून चार आरोपी हे खून करून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
दरम्यान, आरोपींना पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी विविध पथके रवाना केलेली होती. सदरचे आरोपी हे पळून गेल्याने डीबी पथकातील पोलीस नाईक अमिरशा फकीर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे पोलीसांनी सापळा रचून ०४ ऑगस्टला झालेल्या खुनातील आरोपींना जेरबंद केले. सदर गुन्हा घडलेनंतर अवघ्या ०५ तासातच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात कवठेमहांकाळ पोलीसांना यश आले आहे.
हे ही वाचा : तासगावात जुन्या वादातून एकाचा खून