भिलवडी/प्रतिनिधी
पोलीस भरतीची स्वप्न पाहणाऱ्या आरती मधुकर धुरंधरे (रा. बीड, आंबीका रोड पिंपळ). या मागासवर्गीय तरूणीवर तिन नराधमांनी तीचा विनयभंग करुन चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या मुलींचा विनयभंग करणाऱ्या नराधमांचे हात तोडून हातात देण्यासाठी खा. सुप्रियाताई बीडला चाला. तसेच पोलीस केस ही करु, असे अवाहन दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी दै. तरुण भारतशी बोलताना केले.
प्रा. सकटे पुढे बोलताना म्हणाले, आरती धुरंधरे ही पोलीस भरतीसाठी सराव करीत होती. गणेश अबुज हा तीच्या घरी आला. पोलीस भरतीसाठी माझ्या सरांनी तुला बोलावले आहे, असे म्हणत तीला पहाटे पाच-सहाच्या दरम्यान ग्राउंडवर घेउन गेला. ग्राऊंडवर दोन तरुण होते. एकाचे नाव रित्या दुसऱ्याचे नाव अदयाप स्पष्ट नाही. दोघांनी तोंडावर मास्क लावला होता. यावेळी यातरुणांनी तिच्या पोटाला चाकू लावला. नंतर आरती तेथुन पळणार इतक्यात या तिघांनी तिचा पकडले व तिच्यावर चाकूने वार केले तरीही आरती तेथून पळून जाता जाता ती एक खांबाला धडकली आणि बेशुध्द पडली. यांनतर त्या तिघांनी तिच्या अंगावर सर्वत्र चाकूचे वार केले. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती . यांनतर तीला बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवस ती बेशुद्ध अवस्थेत होती. या प्रकाराने समस्त बीडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. परंतु पोलिसांनी सहकार्य केले नाही.
दरम्यान, १६ मे रोजी बालगंधर्व नाट्यगृह पुणे येथे पुस्तक प्रकाशनासाठी आलेल्या केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात महागाई विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी राडा केला. या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यानी एका महीलेच्या श्रीमुखात लगावली ही माहिती खा. सुप्रियाताई यांना समझताच त्यांनी १७ मे रोजी जळगांव येथे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे . पुरुषांनी महिलांना हातच कसा लावला. कुठल्याही महिलेवर हात उगारल्यास त्याचा हात तोडून हातात देईन असे वक्तव्य केले होते. आता बीड मध्ये एका मागासवर्गीय तरुणीचा विनयभंग होऊन तीला जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय. ती मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. तीच्यासाठी, तीला न्याय देण्यासाठी सुप्रियाताई चला बीडला येताय ना, पोलीस केस करू आणि त्या नराधमांचे हात तोडून हातात देऊ, असे आवाहन प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी केले आहे.
पोलीस भरतीचे प्रॅक्टीस करण्यासाठी गेलेल्या मुलीला नाहक त्रास देऊन तिचा विनयभंग करुण तिला जीवे मारण्याचा प्रयत्नकरण्यात आला . पोलीस आरोपींच्या बाजूने बाजू घेत आहेत. दहा दिवसांनी केस नोंद करुन घेतात. राज्यात सरकार तुमचे आहे. गृहमंत्री तुमच्या पक्षाचा आहे. तरीही गरिबांवर अन्यय होतोय याकडे जरा बघा. बोलणारे नेते खूप बघीतले. आम्हाला कृती पाहिजे. बीडला या आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहेत. सरकार, पोलीस यांच्याकडून नाहीत. आपण खऱ्या महिलांच्या पाठीराखा आसाल तर आरती धुरंधरेला न्याय देण्यासाठी बीड याल, असे आवाहन प्रा . मच्छिंद्र सकटे यांनी केले आहे.
बीड मधील सहायक पोलीस निरीक्षक राठोड आणि उपविभागीय पोलिस आधिक्षक वाळके हे आरोपीची बाजू घेत आहेत . घटना घडल्यानंतर दहा दिवसांनी गुन्हा दाखल करून घेतला. मुख्य सुत्रधार गणेशला माफीचा साक्षीदार करून घेतला. कसले गृहखाते न्याय देत नाही . खरया अर्थाने सुप्रियाताई यांनी या बाबत गांभीर्याने घेणं गरजेचे आहे, असेही सकटे म्हणाले.