ऑनलाईन टीम/ तरुण भारत
सांगली अनधान्य व खाद्य वस्तूंवर ५ टक्के जीएसटी लागू करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात उद्या शनिवार (दि.16)रोजी होणाऱ्या देशव्यापी बंदमध्ये सांगलीतील व्यापारी सहभागी होणार असल्याची माहिती चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने अध्यक्ष शरद शहा यांनी दिली आहे.
शहा यांनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, अनधान्य व खाद्य वस्तूंवर केंद्र शासनाकडून पाच टक्के जीएसटी लागू होणार असल्याबाबतचा अंतिम निर्णय जीएसटी कौन्सिलमध्ये घेतला आहे. या बाबतचे नोटीफिकेशन १३ जुलै २०२२ रोजी काढले असून, १८ जुलै २०२२ पासून लागू होणार आहे. केंद्र सरकारने अन्नधान्य, खाद्यात्र व जीवनावश्यक वस्तूंवर पाच टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा मोठा परिणाम आपल्या व्यापारावर, शेतकरी आणि सामान्य नागरिकांवर होणार आहे. त्यामध्ये अन्नधान्य, गूळ, कडधान्य या वस्तूंचा समावेश केला आहे.
हेही वाचा- काळाचा घाला! बोरगावात मण्यार चावल्याने ६ वर्षीय बालकाचा मृत्यू
जीएसटी १८ जुलै २०२२ पासून लागू होणार आहे. या बाबत प्रमुख संघटनांनी देशव्यापी बंद शनिवार १६ जुलै रोजी पुकारला आहे. या बंदमध्ये रिटेल व्यापारी, ग्राहक व शेतकरी बंधू यांना सामील करुन घ्यावे व शनिवार १६ जुलै रोजीचा बंद १०० टक्के यशस्वी करावा, असे आवाहन शहा यांनी केले आहे.