अभिनेत्री कंगना रनौतचे विधान
मागील काही दिवसांमध्ये भाषेवरून चित्रपटसृष्टीत वाद निर्माण होताना दिसून येत आहे. या वादात अजय देवगण, मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी तसेच काही दाक्षिणात्य कलाकारांनी उडी घेतली आहे. आता या वादात कंगना रनौतने स्वतःची भूमिका मांडली आहे.
हिंदीला घटनेने राष्ट्रीय भाषा म्हणून निवडले असून आम्हाला याचा सन्मान करायला हवा. माझ्या मतानुसार संस्कृत राष्ट्रीय भाषा असायला हवी असे तिने म्हटले आहे.
आमच्या समाजात अनेक प्रकारचे लोक आहेत, वेगवेगळय़ा संस्कृती, नातेसंबंध आणि भाषा आहेत. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या संस्कृतीबद्दल अभिमान बाळगण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. मी पहाडी असल्याने मला माझी संस्कृती आणि भाषेवर गर्व आहे. परंतु आम्हा सर्वांना एक धागा असायला हवा. तमिळ ही हिंदीपेक्षाही जुनी भाषा आहे. परंतु त्याहून जुनी भाषा संस्कृत आहे. माझ्यानुसार तरी संस्कृतला राष्ट्रीय भाषेचा दर्जा असायला हवा असे कंगना म्हणाली.कन्नड, तमिळपासून गुजराती आणि हिंदी सर्व भाषा संस्कृतमधूनच जन्माला आल्याचे तिने म्हटले आहे.