सातारा/प्रतिनिधी
यंदा जुन महिना अखेर पर्यंत जिल्हय़ात पावसाचे आगमन झाले नव्हते, त्यामुळे जिल्हय़ातील सर्वच धरणांची पाणी पातळी खालावली होती. पण जुलै महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरल्याने पुन्हा जिल्हय़ातील पाणलोट क्षेत्रे भरू लागली आहेत. सध्या जिल्हय़ातील सर्वच धरणांच्या पाणी पातळींमध्ये वाढ झाली असुन, जिल्हय़ातील धरणे भरू लागल्याचे चित्र दिसुन येत आहे.
अनेक धरणातील पाणी साठय़ांचा विसर्ग ही करण्यात येत असल्याने आसपासच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा ईशाराही सातारा सिंचन मंडळाच्या वतीने देण्यात येत आहे. शनिवारीही अनेक धरणातील पाणीसाठय़ाचा विसर्ग करण्यात आला असुन यामध्ये उरमोडी सांडवा विसर्ग हा एकुण 2000 क्युसेक पर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच वीर धरनातून नीरा नदीच्या पात्रात ही 15312 इतका विसर्ग करण्यात आला आहे.
तसेच पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास या विसर्गामध्ये वाढ ही होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर हवामान खात्याच्या अहवालानुसार रविवारी ही जिल्हय़ातील घाट विभागात मोठय़ा प्रमाणात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील नदी, नाले, धरणे, तलाव यांच्या पाणी पातळींमध्ये आणखिन वाढ होणार हे नक्की.
जिल्ह्य़ातील मध्यम प्रकल्पाच्या धरणांमधील उपयुक्त साठा
जिल्ह्य़ात एकुण 10 मध्यम प्रकल्पाची धरणे असुन याच्या पाणी पातळींमध्ये ही सध्या वाढ झाली आहे. येरळवाडी (0.13), नेर (0.09), राणंद (0.07), आंधळी(0.01), नागेवाडी(0.08), मोरणा (0.89), उत्तरमांड (0.51), महू(0.58), हातगेघर (0.10), वांग(0.12) इतका उपयुक्त पाणी साठा आहे.
जिल्हय़ातील उपयुक्त धरण साठा
धरण
उपयुक्त पाणी साठा
कोयना
47.02
धोम
5.47
धोम बलकवडी
2.7
कण्हेर
4.65
उरमोडी
6.1
तारळी
4.3
निरा-देवघर
5.24