सातारा प्रतिनिधी
सातारा एलसीबीच्या पथकाने पुणे परिसरात केलेल्या छापेमारीत वाईच्या खून प्रकरणातील ३ अल्पवयीन फरार असलेला संशयित आरोपींना ताब्यात घेतले.वाई शहरातील रहिवासी असलेला अर्जुन मोहन यादव वय २५ याचा अज्ञात मारेकर्यांनी गोळ्या घालून २ जुलै ला खुन केला होता.घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाले होते त्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल यांनी तपासाची गती वाढवली होती. सातारा पोलिसांनी २४ तासांच्या आत तिघा संशियिताना ताब्यात घेतलं आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सपोनि रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक पाटील, शरद बेबले, यांच्यासह अन्य सहकारी पथकाला आरोपी शोधण्यासाठी पाचारण करण्यात आले होते .या पथकाने सातारा जिल्ह्यातील भुईंज, कोरेगाव, पुसेगाव या ठिकाणी या पथकाने धाडी टाकल्या होत्या. पण त्या ठिकाणी काहीच न सापडल्याने या पथकाने तपासाची दिशा बदलून मोर्चा पुण्याच्या दिशेने बदलला. त्यावेळी टाकलेल्या धाडीत ३ अल्पवयीन आरोपींना गजाआड करण्यात या पथकाला अखेर यश आले आहे. इतर २ आरोपींना लवकरच गजाआड करणार असल्याची माहिती या पथकाने दिली.
सातारा येथील बॉम्बे रेस्टारॅट चौक परिसरातील नटराज मंदिरासमोर अर्जुन यादव पिस्तुलाच्या साहाय्याने खून केल्याची घटना शनिवारी घडली होती. दुचाकी वरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी के कृत्य केल्याचं पोलीस तपासात सिद्ध झालं होत. त्या दृष्टीने पोलिसांनी तपासकार्य सुरु ठेवले होते.