‘द केरळा स्टोरी’च्या (The Kerala Story ) निर्मात्यांनी जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी विधाने केली असल्याने तामिळनाडू सरकारने (Tamilnadu Government) या चित्रपटावर बंदी घातली असली तरी प्रेक्षकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे चित्रपटगृहांनी प्रदर्शन थांबवले असल्याचा खुलासा तामिळनाडू सरकारने दिला आहे.
यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने (Suprem Courte)तमिळनाडू सरकारला दि केरला स्टोरीच्या निर्मात्यांच्या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. चित्रपटात आक्षेपार्ह संदेश असल्याचा दावा करून तामिळनाडू राज्यात चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.
सुप्रिम कोर्टासमोर तमिळनाडूने दाखल केलेल्या आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, “द केरला स्टोरी या चित्रपटाला मिऴणाऱ्या प्रेक्षकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे थिएटर मालकांनी स्वतःच चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले आहे. राज्यातील चित्रपटगृहांना सुरक्षा पुरवण्याशिवाय तामिळनाडू सरकार या चित्रपटासाठी प्रेक्षक संरक्षण वाढवण्यासाठी काहीही करू शकत नाही.” असा निर्वाळा दिला आहे.
पुढे या प्रतिज्ञापत्रात राज्याने म्हटले आहे की, “राज्यातील थिएटर मालकांनी कलाकारांच्या खराब कामगिरीमुळे या चित्रपटाला कमी प्रतिसाद मिळत आहे. तसेच चित्रपटात सुप्रसिद्ध कलाकार नसल्यामुळे व्यावसायिक दृष्ट्य़ा हे नुकसानीचे ठरत त्यामुळे 7 मे पासून चित्रपटाचे प्रदर्शन स्वेच्छेने थांबवले.” असे म्हटले आहे.