नव्या संशोधनामुळे भारत-बांगलादेशच्या चिंतेत भर
वृत्तसंस्था / कोपेनहेगन
जागतिक तापमानवाढीमुळे मोठय़ा प्रमाणावर ग्रीनलँडमधील हिमखंड वितळत आहेत. बर्फ वितळत चालल्याने समुद्राच्या पातळीत 1 फुटाची वाढ होणार आहे. जगातील उष्मा उत्सर्जन आताच रोखले गेले तरीही बर्फ वितळण्यापासून रोखण्यात येणार नसल्याचे संशोधनात म्हटले गेले आहे. नेचर क्लायमेटमध्ये याच्याशी निगडित अध्ययन प्रकाशित करण्यात आले आहे.
डेन्मार्क अन् ग्रीनलँडच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या संशोधकांनी ग्रीनलँड अन् त्याच्या आसपास बर्फाच्या आवरणात बदल पाहिला आहे. ग्रीनलँडमधील बर्फाचे आच्छादन सुमारे 3.3 टक्के कुठल्याही स्थितीत वितळणार आहे. हा वितळलेला बर्फ 110 ट्रिलियन टनाइतका असणार आहे.
कुठल्याही प्रकारच्या हवामानाच्या स्थितीत बर्फ वितळणार असून समुद्राच्या पातळीत वाढ होणार आहे. परंतु हे कधीपर्यंत होईल हे निश्चितपणे सांगता येणार नाही. हे आताच सुरू होत शतकाच्या अखेरपर्यंत घडू शकते. उष्ण वाऱयांमुळे हिमाचे आच्छादन वेगाने वितळते, याचबरोबर समुद्रातील उष्ण पाणी किनाऱयावरील बर्फ वितळवत असल्याचे संशोधनाचे प्रमुख लेखक आणि वैज्ञानिक जेसन बॉक्स यांनी म्हटले आहे.