कागवाड : आमदार श्रीमंत पाटील हे बीएससी पदवीधर आहेत. त्यांना शेतीविषयी अपार आवड व अनुभव आहे. याबरोबर गोरगरीब शेतकर्यांविषयी फारच मोठा आदर आहे. याकाfरता त्यांनी अनेक वर्षापासून रेंगाळत पडलेली खिळेगाव-बसवेश्वर पाणीपुरवठा योजना पूर्ण करून शेतकर्यांच्या शेतात पाणी पुरवण्याचा संकल्प केला आहे तो आता पूर्ण होत आहे. अशा शेतकर्यांच्या पुत्राला मतदार बांधवांनी भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन माजी पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले.
ते कागवाड तालुक्यातील अनंतपूर येथे रविवारी भाजपचे उमेदवार श्रीमंत पाटील यांच्या प्रचारादरम्यान बोलत होते. यावेळी अनंतपूर येथे उघडय़ा जीपमधून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पुढे बोलताना रमेश जारकीहोळी म्हणाले, श्रीमंत पाटील दोनवेळा आमदार झाले आहेत. तिसर्यांदा आमदार होताना कोणी कितीहि विरोध केला तरी त्यांना रोखता येणार नाहि. मतदारांनी त्यांच्या विजयाचा संकल्प केला आहे. काहि विरोधक या निवडणुकीमध्ये केवळ जातीयतेचे राजकारण करीत आहेत. मतदार त्यांना चांगले ओळखून आहेत. त्यामुळे त्यांना यश मिळणे शक्यच नाहि, असे सांगितले.
उमेदवार श्रीमंत पाटील म्हणाले, माPया राजकीय जीवनामध्ये कधीहि जातीचे राजकारण केले नाहि. मी सर्व समाजातील नागाfरकांना एकाfत्रत करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करीत आहे हे जनतेला हि माहिती आहे. मतदारसंघात शिक्षणासाठी अधिक लक्ष दिले असून सुमारे 2500 शाळा खोल्या उभारल्या आहेत. मतदारसंघातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. यासह विविध विकासकामे केल्याने मतदार माPय़ा पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
अनंतपूर येथील लिंगायत समाजाचे राजकीय नेते रुद्रगौडा पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ताbसमवेत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी दादा शिंदे, शिवानंद पाटील, चंद्रशेखर कवटगी, केएमएफचे अध्यक्ष आप्पासाहेब अवताडे, ईश्वर कुंबारे, महादेव कोरे, सुशांत पाटील, तम्मण्णा पुजारी, आप्पासाहेब मळमळशी, तम्मण्णा पारशेट्टी, कुमार हबगुंडे यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.