अभिनेते योगेश शिरसाट व प्रदीप कुडतरकर यांनी कृष्णामाई जत्रेच्या निमित्ताने पत्रकारांशी साधला संवाद
सांगली : प्रतिनिधी
सध्या सगळ्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. कोणाच्या भावना कश्या दुखावतील हे सांगता येत नाही. विनोद करताना सुद्धा आता तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्याच्या संवेदनशील सामाजिक स्थितीत विनोदाची निर्मिती करणे, फार आव्हानात्मक बनल्याची प्रतिक्रिया लेखक अभिनेते योगेश शिरसाट व प्रदीप कुडतरकर यांनी व्यक्त केली.
झी मराठी वरील चला हवा येऊ द्या, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, मन झालं बाजींद, माझी तुझी रेशीम गाठ या मालिकांमधील कलाकार आणि लेखक सांगलीत आले होते. यावेळी लेखक, अभिनेते प्रल्हाद कुडतरकर, लेखक, अभिनेते योगेश शिरसाट, अभिनेत्री स्नेहल शिदम, अभिनेता अंकुश वाढवे, अभिनेता वैभव चव्हाण, अभिनेत्री श्वेता खरात आणि अभिनेत्री काजल काटे आदींनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, सांगली हे कलावंतांचं माहेरघर आहे. सांगलीत आल्यावर खूप आनंद होतो. हल्ली सगळ्यांच्या भावना आत्ता तीव्र झाल्या आहेत. कोणाच्या भावना कश्या दुखावतील हे सांगता येत नाही. त्यामुळे कलाकारांनी, विनोद करतानासुद्धा आता सर्व गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. विनोद करतानासुद्धा आता तारेवरची कसरत करावी लागत आहे. विनोदामुळे कधी कोणाच्या भावना दुखावतील याचा नेम नसतो असे त्यांनी सांगितले.