देवी दर्शनासाठी पायी चालत येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक
प्रतिनिधी/तुळजापूर
शारदीय नवरात्र महोत्सवात शनिवारी सहाव्या माळेला श्री तुळजाभवानी देवीची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री तुळजाभवानी मातेची नित्योपचार पूजा आणि अभिषेक पूजेनंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली.
या दिवसाचे महत्त्व भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये शेष शैयावर विश्राम घेत असताना मातेने यांचे नेत्र कमलात जाऊन विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या दोन्ही कानातून निघालेल्या मला (मळ) पासून दोन दैत्य उत्पन्न झाले. त्यांची नावे शुंभ व निशुंभ आहेत. ते उत्पन्न होताच शेष शैयावरील विष्णूवर आक्रमण करण्यास जाऊ लागले. त्यावेळी नाभी कमलात विराजमान असलेल्या ब्रह्मदेव यांनी विष्णूच्या नेत्र कमलात विश्राम घेणाऱया देवीची स्तुती करून श्रीस जागविले व विष्णूवर आक्रमण करणाऱया दैत्यांचा वध श्री तुळजाभवानी मातेने केला म्हणून विष्णूने आपले शेष शैया श्रीस विश्राम करण्यासाठी दिले. त्यामुळे ही शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.
श्री तुळजाभवानी मंदिर दरबारात देवीभक्त मोठय़ा उत्साहात प्रतिवषी प्रमाणे आपला नियमित खेटे पूर्ण करत दाखल झाले होते. कार पार्किंग, दर्शन रांगा गर्दीने फुलून गेल्या होत्या. आई राजा उदो उदोच्या गजरात जयघोष करत मंदिरात प्रवेश करत मनोभावे दर्शन घेत होते. मंदिर परिसरात देवी भक्त सातत्याने वेगवेगळ्या फुलांच्या सजावटी करत आपली सेवा अर्पण करण्यासाठीच्या कामांना वेग आला होता. दर्शन रांगांमधील भाविकांना जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याचे दिसून आले.
दरम्यान, काल रात्री देवीची वाघ वाहनावर छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी देवीभक्तांची गर्दी पाहावयास मिळाली.
व्हीआयपींची संख्या जास्त
शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मुखदर्शन व धर्म दर्शनाला भाविकांना दोन दोन तीन तीन तास लागत आहेत. अशातच दर्शनासाठी येणाऱया व्हीआयपींची संख्या जास्त असल्याने रांगेमध्ये थांबलेल्या भाविकांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत असतो. तसेच पेड दर्शन करणाऱयाही भाविकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. पाचशे रुपये व्हीआयपी दर्शन पासलाही भाविकांची गर्दी होत आहे.
पायी चालत येणाऱया भाविकांची संख्या जास्त
नवरात्रात पायी चालत येणाऱया भाविकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. सोलापूर, नळदुर्ग, बार्शी, लातूर, उस्मानाबाद येथून पायी चालत येणाऱया भाविकांसाठी ठिकठिकाणी मोफत अन्नदान करणारे अन्नछत्रची संख्या भरपूर आहे तर पायी चालत आल्यानंतर दर्शन रांगेतून परत पायपीट आणि दर्शन मंडपातील पायऱयांची चढ उतार करून आल्यानंतर भाविकांना दर्शन मिळत आहे.