पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल राज्यपाल मिळाले
ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच बंडखोर आमदारांनी घेतलेल्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केले. दरम्यान, राज्यपालांना अधिक कष्टदायी काम असल्यामुळे त्यांनी वर्षभर अध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला नव्हता. पण हे सरकार आल्यानंतर ४८ तासांत तोच निर्णय घेण्यात आला. पदाची प्रतिष्ठा वाढवणारे राज्यपाल राज्यपाल मिळाले, पण हे राज्यपाल, अशा शब्दांत शरद पवारांनी राज्यपालांवर टीका केली आहे. तसेच खरी शिवसेना कोणती “हे उद्या कोर्ट सांगेल. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असे ते म्हणाले.
यावेळी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मुद्दावर पवार म्हणाले की, काही तरी कारण द्याव, म्हणून ते देत आहेत. शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना सोडण्यासाठी कधी हिंदुत्वाचं तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचं कारण दिलं. शिवसेना सोडण्यासाठी त्यांच्याकडे ठोस कारण नसल्याचंही पवार यांनी नमूद केलं.
औऱंगाबादच्या नामांतराच्या मुद्दावर पवार म्हणाले की, महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात नामांतराचा मुद्दा नव्हता. तसेच नामांतराच्या मुद्दावर सुसंवाद झाला नव्हता असंही अस पवार यांनी स्पष्ट केलं. या विधानामुळे शरद पवारा यांनी नामांतराच्या मुद्दातून राष्ट्रवादी काँग्रेसला बाजुला केलं का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
हे ही वाचा : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत- अजित पवार
यावेळी शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल मोठं विधान केलं आहे. शिवसेनला झालेली मोठी हानी आणि सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचं काय होणार असे प्रश्न उपस्थित झाले आहे. त्यावर शरद पवार म्हणाले की, पुढील काळात येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात अशी आपली इच्छा आहे. मात्र हे निर्णय बसून चर्चेतून घ्यावे लागतील, असंही त्यांनी नमूद केलं.
शरद पवार यांना पत्रकारांनी यावेळी खरी शिवसेना कोणती? असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. खरी शिवसेना कोणती “हे उद्या कोर्ट सांगेल ना? हे दोघं आमचीच खरी शिवसेना आहे, असं म्हणत आहेत. असे प्रश्न सध्या न्यायप्रविष्ट आहेत. त्याला काही पद्धती आहेत. या सगळ्या संकटातून मी स्वत: एकदा गेलो आहे. अशा गोष्टी राजकारणात होत असतात. त्याचा अंतिम निर्णय शेवटी निवडणूक आयोग देत असतं. तो निकाल लवकर येईल, अशी अपेक्षा आहे”, असं शरद पवार म्हणाले.
हे ही वाचा : ‘दादा’चे लाड, सत्ताधाऱ्यांचा विजयी चौकार