Rohit Pawar News : दंगल झाल्यानंतर सामान्य नागरिकांचं नुकसान होतं.ही दंगल घडली का घडवली हे पहावं लागेल.कारण घटनास्थळी पोलीस उशिरा पोहचले होते.त्याठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवला नाही. समाजात वाद निर्माण कसा राहील याचा प्रयत्न केला जातो.खोट्या बातम्यांवर पदं मिळवण्यासाठी छोटी माणसं तयार होतं आहेत.छोट्या विचारांच्या माणसावर न बोललेलं बरं.शरद पवार साहेब यांच्यावर बोलणं बंद केलं नाही तर तुमची झोप कशी उडवली जाईल हे आम्ही सर्वजण बघू असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिला. आज ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
भाजपवर निशाणा साधताना रोहित पवार म्हणाले की,भाजप हे संविधानाच्या विरोधात कार्यकर्त्यांना भडकवत आहे का हे पहावं लागेल. भाजप नेहमी संविधान विरोधी वागले आहेत.कर्नाटकात जशी जनतेने जागा दाखवली तशी जागा महाराष्ट्रातील जनता दाखवेल.भाजपने इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला आहे.चुकीच्या पद्धतीने बोलणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं जातं. कार्यकर्त्या चुकीचा वागला तरी त्याची बाजू भाजप घेत असते. श्रीकांत शिंदे यांच्या जागी भाजपचा खासदार निवडून आणण्याची जबाबदारी काही नेत्यांवर दिली आहे.पद मिळवण्यासाठी फडतुसगिरी चालू असल्याची टीका रोहित पवार यांनी केली.
चित्रा वाघ या आता एका मंत्र्याबद्दल बोलायच्या बंद झाल्या आहेत.महाविकास आघाडी सरकार असताना आणि आता देखील मंत्री असलेल्या नेत्यावर त्या बोलत नाहीत.महाराष्ट्राच्या जनतेला बदल हवा आहे.त्याला महाविकास आघाडी नक्की पर्याय देईल.शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी शासकीय कर्मचारी यांच्यावर जबाबदारी दिलीय.लोकं आपल्या सोबत असल्याच दाखवण्याचा हा प्रयत्न केला जातोय.कृषी अधिकाऱ्यांना वसुलीच्या सूचना दिल्या आहेत.त्यामुळे कृषी विभागात मोठा भ्रष्टाचार होत आहे.कर्नाटकात 40 टक्क्यांची चर्चा होती महाराष्ट्रात 50 टक्के वसुली सुरू झाली असल्याचेही ते म्हणाले.